शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

Maharashtra Vidhan Parishad Election: शेवटच्या क्षणी 'तो' आमदार न्यूयॉर्कवरुन परतला, विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 08:52 IST

Maharashta Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत असून दहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि  भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

Maharashta Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत असून दहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि  भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपाने महाविकास आघाडीला चितपट करत आपले सर्व उमेदवार निवडून आणले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरणार असा विश्वास भाजपा आमदार व्यक्त करत आहेत. दहाव्यासाठी एक एक मत महत्वाचं ठरणार आहे. यातच राज्यसभा निवडणुकीवेळी बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही बविआच्या तीन मतांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. विधान परिषद निवडणुकीचे LIVE UPDATES पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र न्यूयॉर्कला गेले होते. त्यामुळे ते विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं. पण नेमकं मतदानाच्या दिवशी आमदार क्षितीज ठाकूर मुंबईत परतले आहेत. त्यामुळे ते आज मतदानाला उपस्थित राहणार आहेत. 

हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं मिळावीत यासाठी राज्यातील प्रमुख उमेदवारांनी त्यांची भेट घेतली होती. पण क्षितीज ठाकूर नातेवाईकाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला गेल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मतदानाला ते उपस्थित नसतील अशी चर्चा होती. अखेरीस ते आज मुंबईत पोहोचले असून मतदान करणार आहे. बविआची ही तीन मतं कुणाला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबतंरात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात जाऊन मार्गदर्शन केले. ‘चिंता करू नका, आपल्याला विजय सोपा नसला तरी अशक्यप्राय काहीही नाही’ या शब्दांत विश्वास व्यक्त केला.  अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचा सल्ला दिला. 

 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVasai Virarवसई विरार