शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 20:13 IST

सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ...

सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर भाष्य केलं. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपाची साताऱ्यात सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंनी तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला.छत्रपतींच्या घराण्यानं तुम्हाला खूप काही दिलं. पण तुम्ही त्यांना काय दिलं, असा प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादीनं स्वत:ला विचारावा, असा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. छत्रपतींचं घराणं हे घेणारं घराणं नाही, तर देणारं घराणं आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले. राज्यातलं महायुतीचं सरकार समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतंय. 5 वर्षांत शेतकऱ्यांना 50 हजार कोटी देण्यात आले आहेत. रस्त्यांची कामं मार्गी लावण्यात आली आहेत. साताऱ्यातले प्रकल्पदेखील पूर्ण केले जातील, असं फडणवीस यांनी म्हटलं. साताऱ्यातली रस्त्यांची कामं करावीत. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावं, अशा मागण्या उदयनराजेंनी त्यांच्या भाषणातून मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर बोलताना महाराजांनी मागण्या करायच्या नसत्या. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात असं मुख्यमंत्री म्हणाले. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंना आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयराजेंना प्रचंड बहुमतानं निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले