शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

महाराष्ट्राची ओळख 'महानंद' गुजरातला जाणार?; विरोधकांचा दावा सरकारनं फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:22 IST

महाराष्ट्राची ओळख पुसण्यामागे कोण आहे ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का? डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतायेत असा आरोप राऊतांनी केला. 

मुंबई - महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जातो. अलीकडेच पाणीबुडी प्रकल्प गुजरातला नेला असं विरोधक सांगत होते त्यातच आता राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महानंदचा कारभार गुजरातच्या हाती जाणार असल्याचे समोर आले. राज्याचा महानंद प्रकल्प गुजरातला देण्याचा सरकारचा डाव आहे. महानंद ही महाराष्ट्राची ओळख असून ती पुसण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

संजय राऊत म्हणाले की, रोज एक एक व्यवसाय खेचून गुजरातला नेला जात आहे तरी सत्ताधारी तोंडाला कुलूप लावून बसलेत. हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते? महाराष्ट्रात अनेक दूधाचे ब्रँड आहेत. गोकुळ, वारणा, चितळे असे अनेक आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दूध उत्पादकाचे फार मोठे जाळे आहे. त्यासाठी राज्यात अमूलचे पाहिजे असं नाही. कर्नाटकात नंदिनी ब्रँड आहे. या ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला. नंदिनी ब्रँडवरूनच निवडणूक लढवली गेली. महाराष्ट्रातही असेच सुरू आहे. महानंद हेदेखील गुजरातला नेण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राची ओळख पुसण्यामागे कोण आहे ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का? डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतायेत असा आरोप त्यांनी केला. 

राऊतांच्या आरोपावर मंत्र्यांचे प्रत्युत्तर

'महानंद' गुजरातला जाणार हे पूर्णपणे चुकीचे आहे. महानंद ही डबघाईला आलेली संस्था असून मागील ५-६ वर्षापासून गैरव्यवस्थापनामुळे ही संस्था अडचणीत आली. आपण राज्यातील प्रमुख दूध संस्थांना महानंद चालवायला घ्या अशी विनंती केली. NDDB ही गुजरातची संस्था नाही. NDDB चालवणार म्हणजे त्यांच्या ताब्यात संस्था देणार नाही. जळगाव दूध संघ डबघाईला गेला होता. मग तो NDDB नं चालवला. १० वर्षात तो नफ्यात आणला आणि परत तो जळगाव संघाला देऊन टाकला. याच धर्तीवर महानंद NDDB कडे चालवायला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

काय आहे आरोप?

'महानंद' नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालवायला देण्याचा निर्णय महानंदच्या संचालक मंडळाने घेतला. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. मात्र  राज्यातील उद्योग राज्याबाहेर जात असताना आता दूध व्यवसायही राज्याबाहेर चालवायला द्यायचा. विशेषत: गुजरातसाठी पायघड्या घालायचा म्हणून हा निर्णय घेतला जातोय असा आरोप किसान महासभेने केला आहे. एकीकडे राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. विधिमंडळात ५ रुपये अनुदान देऊ असं जाहीर करूनही शेतकऱ्यांना अद्याप ते सुरू केले नाही.तर दुसरीकडे गुजरातच्या राज्यकर्त्यांना पायघड्या घालत दूग्ध व्यवसाय त्यांना बहाल करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याचा निषेध आहे असं किसान महासभेचे अजित नवले यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील