शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची ओळख 'महानंद' गुजरातला जाणार?; विरोधकांचा दावा सरकारनं फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:22 IST

महाराष्ट्राची ओळख पुसण्यामागे कोण आहे ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का? डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतायेत असा आरोप राऊतांनी केला. 

मुंबई - महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जातो. अलीकडेच पाणीबुडी प्रकल्प गुजरातला नेला असं विरोधक सांगत होते त्यातच आता राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महानंदचा कारभार गुजरातच्या हाती जाणार असल्याचे समोर आले. राज्याचा महानंद प्रकल्प गुजरातला देण्याचा सरकारचा डाव आहे. महानंद ही महाराष्ट्राची ओळख असून ती पुसण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

संजय राऊत म्हणाले की, रोज एक एक व्यवसाय खेचून गुजरातला नेला जात आहे तरी सत्ताधारी तोंडाला कुलूप लावून बसलेत. हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते? महाराष्ट्रात अनेक दूधाचे ब्रँड आहेत. गोकुळ, वारणा, चितळे असे अनेक आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दूध उत्पादकाचे फार मोठे जाळे आहे. त्यासाठी राज्यात अमूलचे पाहिजे असं नाही. कर्नाटकात नंदिनी ब्रँड आहे. या ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला. नंदिनी ब्रँडवरूनच निवडणूक लढवली गेली. महाराष्ट्रातही असेच सुरू आहे. महानंद हेदेखील गुजरातला नेण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राची ओळख पुसण्यामागे कोण आहे ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का? डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतायेत असा आरोप त्यांनी केला. 

राऊतांच्या आरोपावर मंत्र्यांचे प्रत्युत्तर

'महानंद' गुजरातला जाणार हे पूर्णपणे चुकीचे आहे. महानंद ही डबघाईला आलेली संस्था असून मागील ५-६ वर्षापासून गैरव्यवस्थापनामुळे ही संस्था अडचणीत आली. आपण राज्यातील प्रमुख दूध संस्थांना महानंद चालवायला घ्या अशी विनंती केली. NDDB ही गुजरातची संस्था नाही. NDDB चालवणार म्हणजे त्यांच्या ताब्यात संस्था देणार नाही. जळगाव दूध संघ डबघाईला गेला होता. मग तो NDDB नं चालवला. १० वर्षात तो नफ्यात आणला आणि परत तो जळगाव संघाला देऊन टाकला. याच धर्तीवर महानंद NDDB कडे चालवायला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

काय आहे आरोप?

'महानंद' नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालवायला देण्याचा निर्णय महानंदच्या संचालक मंडळाने घेतला. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. मात्र  राज्यातील उद्योग राज्याबाहेर जात असताना आता दूध व्यवसायही राज्याबाहेर चालवायला द्यायचा. विशेषत: गुजरातसाठी पायघड्या घालायचा म्हणून हा निर्णय घेतला जातोय असा आरोप किसान महासभेने केला आहे. एकीकडे राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. विधिमंडळात ५ रुपये अनुदान देऊ असं जाहीर करूनही शेतकऱ्यांना अद्याप ते सुरू केले नाही.तर दुसरीकडे गुजरातच्या राज्यकर्त्यांना पायघड्या घालत दूग्ध व्यवसाय त्यांना बहाल करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याचा निषेध आहे असं किसान महासभेचे अजित नवले यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील