शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

राजापुरातील ‘रिफायनरी’ प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, तहसिलदार कार्यालयावर काढला महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2017 2:17 PM

रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.  या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जैतापूर, दि. 9 - रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.  या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या महामोर्चामध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या मोर्चेक-यांनी यावेळी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवाय, त्यांनी आपल्या व्यथा तहसिदार आणि प्रांत कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दाखल केल्या आहेत.  कोणत्याही  परिस्थितीत हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान, अणुऊर्जा प्रकल्पापाठोपाठ रिफायनरी प्रकल्पातील संघर्ष आणखीनच तीव्र होणार असल्याचं दिसते आहे. 

काय आहे नेमका प्रकल्प?केंद्र शासनाच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल अशी 51 टक्के, तर राज्य सरकारची 49 टक्के भागीदारी असलेला जगातील सर्वात मोठा दोन लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार -सागवे परिसरात येऊ घातला आहे. एकूण या प्रकल्पाला  15 हजार एकर जमीन आवश्यक असून काही एकर जागेवर तो उभा राहणार आहे. हा प्रकल्पही अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच प्रदूषणकारी असल्याचे आरोप स्थानिक जनतेतून होत असून आमच्या बागायती, भातशेती व निसर्ग यांचे रक्षण व्हावे या हेतूने येथील जनता प्रकल्पाविरुद्ध उभी ठाकली आहे.   दरम्यान, हा प्रकल्पच रद्द झालाच पाहिजे, यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (9 सप्टेंबर ) तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.