शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:38 IST

Taliye village Landslide: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच तळीये वासियांच्या भेटीला जाणार असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी फोनवरून सांगितले आहे.

महाड/मुंबई: गेल्या महिन्यात कोकणात महापुराने कहर केला होता. महाडच्या तळीये गावात दरड (Taliye village Landslide) कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दरडीखाली 35 घरे दबली गेली. या दुर्घटनेत वेळीच मदत मिळाली असती तर 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. दुर्दैव म्हणजे तळीये गावापासून अवघ्या दोन किमी अंतरावर स्थानिक आमदारांचे घर आहे. तरीदेखील ते घटनास्थळी पहायलाही आले नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मनसेचे नेते गणेश चुक्कल तळीये गावात गेले आहेत. त्यांच्यासमोर स्थानिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. (MLA home at 2 KM distance, but they not came to help in Taliye Landslide victims: MNS)

तळीये दुर्घटनेत 80 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. गावावर जेव्हा दरड कोसळली त्यानंतर 22 तास कोणतीही मदत पोहोचली नाही. प्रशासनाने एक फोकलेन जरी दिला असता तरी माती उकरली असती आणि 50 ते 55 जणांना वाचवता आले असते, अशी व्यथा स्थानिकांनी गणेश चुक्कल यांच्यासमोर मांडली.

या दुर्घटनाग्रस्तांकडे शासनाची कुठलीही मदत पोहचली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गणेश चुक्कल यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना फोन करून स्थानिकांसोबत त्यांचा संपर्क करून दिला. ६ महिन्याचं बाळ गमावलेल्या वडिलांनी राज ठाकरेंकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आमचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं अशी विनंती फोनवरुन केली. त्यावर शर्मिला ठाकरेंनी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच राज ठाकरे आपल्याला भेटतील असं आश्वासन दिल्याचे चुक्कल यांनी सांगितले. (Raj Thackeray will visit soon at Taliye Village.)

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगडMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे