शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

जिहादवरून 'महाभारत'; शिवराज पाटलांच्या वादग्रस्त विधानावर भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:04 IST

शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची तुलना जिहादशी केली हे त्यांच्या कॉंग्रेसी संस्काराशी सुसंगत असेच आहे असं भाजपानं म्हटलं आहे.

नोएडा - माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी श्री कृष्णाबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय मैदानात या वादाला सुरुवात झाली. श्री कृष्णाने अर्जुनला जिहाद शिकवला असं विधान शिवराज पाटील यांनी केले. त्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

शिवराज पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, तुम्ही कुराण वाचा, त्यात ईश्वराच्या कुठल्याही रुपाची चर्चा नाही. ईश्वर रुपविहिन आहे. गीता आणि बायबलमध्येही हाच प्रकार आहे. मी जे बोललो ते चुकीच्या रितीने समोर आणले गेले असं ते म्हणाले, यावेळी शिवराज पाटील संतापल्याचं दिसून आले. एका पत्रकाराला शिवराज पाटील यांनी विचारलं की, तुम्ही श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश दिला त्याला जिहाद म्हणणार का? त्यावर काहीही उत्तर आलं नाही. तेव्हा मीदेखील हेच म्हणत आहे असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते शिवराज पाटील?जिहादची व्याख्या केवळ इस्लाम नाही तर भगवत् गीता आणि इसाई धर्मातही आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवई यांच्या आत्मचरित्राच्या कार्यक्रमाला शिवराज पाटील म्हणाले की, इस्लाम धर्मात जिहादवर खूप चर्चा झाली. जेव्हा योग्य भूमिका आणि गोष्टी माहिती असूनही काही समजत नाही. तेव्हा ताकदीचा वापर केला जातो. हे केवळ कुराणात नाही. महाभारत, गीतेतही लिहिलं आहे. श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहादबाबत म्हटलं असं त्यांनी सांगितले. 

भाजपाचा शिवराज पाटील यांना टोलाशिवराज पाटील यांच्या विधानावरून भाजपाने टोला लगावला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची तुलना जिहादशी केली हे त्यांच्या कॉंग्रेसी संस्काराशी सुसंगत असेच आहे. मुस्लिम तुष्टीकरणासाठी कॉंग्रेस नेहमीच हिंदू धारणांचा अपमान करत असते. यासाठी इतिहासाची मोडतोड केलीच, पण अध्यात्माचीही विकृत मोडतोड करण्याच्या कॉंग्रेसी राजकारणाचा चेहरा शिवराज पाटील यांनी उघड केला. महाभारतातील युद्ध केवळ धर्मांधांचा धुमाकूळ नव्हता किंवा धर्मप्रसाराच्या नावाखाली केलेल्या कत्तली नव्हत्या. दुर्जनांचा नाश करून अधर्माचा धुमाकूळ थांबविण्यासाठी युद्ध करावेच लागेल असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. धर्माच्या नावाने कत्तली करणे आणि अधर्म रोखण्यासाठी दुर्जनांचा नाश करणे या संकल्पनांतील फरक पाटील यांना माहित नाही. त्यांनी गीतेचा अभ्यास केला नसावा किंवा धर्मद्वेष पसरविण्याच्या हेतूने त्यांनी हे विखारी विधान केले असावे. लांगुलचालनाच्या राजनीतीपोटी कॉंग्रेस किती रसातळाला जाते याचे पाटील यांचे विचार हे एक उदाहरण आहे असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Shivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरBJPभाजपा