शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीच्या पहिल्याच सभेचा हार तुटला; नेत्यांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 20:12 IST

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात महाआघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे.

कराड/ कोल्हापूर : कराडमध्ये महाआघाडीची सभा सुरु झाली असून व्यासपीठावर नेत्यांची संख्या वाढल्याने कार्यकर्त्यांनी आणलेला मोठा हार तुटला आहे. यामुळे पहिल्याच सभेला अपशकून झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली. 

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात महाआघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे, अमोल कोल्हे यांच्यासह नेत्यांची संख्या जास्त झाल्याने आणलेला मोठा हार घालताना ताणल्याने तुटला. यामुळे हा पडलेला हार उचलून पुन्हा जोडण्यात आला. 

कोल्हापुरातून महायुती आणि महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे. कराडमध्ये महाआघीडीची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह खासदार उदयनराजे उपस्थित होते. तर कोल्हापुरातील महायुतीच्या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आदी उपस्थित आहेत. दोन्ही सभांना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लोटली आहे.  

भाषणावेळी राजू शेट्टी यांनी भाजपाने अच्छे दिन नाही तर लुच्चे दिन दिल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने कुटुंबासह बँकांचे उंबरठे झिजविले तरीही कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप केला. 

साताऱ्याचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भाषणाला उभे राहताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ही लोकशाही आहे. निवडणुका सुरुच असतात. निवडणुकीत कोणाला, का आणि कशासाठी करायचे याचा विचार केला पाहिजे, असे उदयनराजे यांनी सांगितले. जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात, तेव्हा त्यांचे उद्दीष्ट्य एक असते. पण ज्यावेळी स्वार्थासाठी एकत्र येतात तेव्हा ते स्वार्थाचाच विचार करतात. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत लोकांची दिशाभूल केली गेली. हायटेक प्रचार केला गेला. यामुळे वाट्टेल ती आश्वासने लोकांना दिली. जनता त्याला बळी पडली. तळागाळातल्या लोकांबाबत तळमळीने बोलले पण आजची अवस्था पाहिली तर त्याच लोकांचा विसर पडला. या काळात अन्यायकारक धोरणे आणि निर्णय घेण्यात आले, असा आरोप उदयन राजेंनी केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले