शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Jitendra Awhad: मोठी बातमी! राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवले; गुढीपाडवा, रमजान, आंबेडकर जयंती जोरात साजरी करा, आव्हाडांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:24 IST

Jitendra Awhad राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

मुंबई-

राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा सर्वानुमते निर्णय झाल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे. 

राज्यात कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी अनेक स्तरांतून केली जात होती. तसंच सध्या सण-उत्सवांचा काळ सुरू होत असल्यानं यंदा तरी सण उत्साहात साजरे करायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. राज्यातील कोरोना निर्बंधांबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध उठवण्याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. 

"आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा,  रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

दरम्यान, राज्यातील कोरोना निर्बंध मागे घेण्यात आले असले तरी कोरोना प्रतिबंधक उपायांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. यात मास्क वापरणं ऐच्छिक असणार असल्याचाही निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस