शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

Magnetic Maharashtra : प्रिंट मीडिया भविष्यातही प्रभावी राहील; 'लोकमत'च्या ऋषी दर्डा यांचा ठाम विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 19:37 IST

आज सगळेच जण डिजिटलबद्दल बोलतात. प्रत्येक उद्योगात डिजिटल जोरात आहे. बातम्यांचं जगही त्याला अपवाद नाही. पण वर्तमानपत्रं, अर्थात प्रिंट मीडियाही यापुढच्या काळात तितकाच प्रभावी राहील, असा विश्वास लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आज व्यक्त केला.

मुंबई - आज सगळेच जण डिजिटलबद्दल बोलतात. प्रत्येक उद्योगात डिजिटल जोरात आहे. बातम्यांचं जगही त्याला अपवाद नाही. पण वर्तमानपत्रं, अर्थात प्रिंट मीडियाही यापुढच्या काळात तितकाच प्रभावी राहील, असा विश्वास लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आज व्यक्त केला. मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये 'मीडियाः शेपिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन अँड एन्टरटेन्मेंट' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी ट्रेनच्या एखाद्या डब्यात १०० जण पेपर वाचताना दिसायचे. आज ही संख्या २० वर आली आहे. वृत्तपत्रांची जागा स्मार्टफोनने घेतलीय, पण वृत्तपत्रांवरचा विश्वास जराही कमी झालेला नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कमी किंमत आणि सोयीस्करपणे - अगदी घराच्या दारात उपलब्ध होत असल्यानं  वृत्तपत्रं जनतेच्या मनात घर करून आहे. त्यामुळे या माध्यमाबाबत लोकमत सकारात्मक असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

या चर्चासत्रात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, दिग्दर्शक रितेश सिधवानी, व्हायकॉम 18चे ग्रूप सीईओ सुधांशू वत्स, रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे कन्टेंट हेड विजय सुब्रमण्यम सहभागी झाले होते. हे सगळ्यांचा भर डिजिटल मीडियावर असताना, ऋषी दर्डा यांनी वर्तमानपत्रांची - प्रिंट मीडियाची ताकद वर्णन केली. लोकमतचे ३०० वार्ताहर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील बातम्या देण्यासाठी सज्ज आहेत आणि त्या वाचकांनाही हव्यात, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

प्रिंट मीडियासोबतच इंटरनेट, डिजिटल मीडियाबाबतही लोकमत समूह जागरूक आहे आणि त्यातही चांगली गुंतवणूक करत असल्याचं ऋषी दर्डा म्हणाले. पुढच्या चार ते पाच वर्षांत ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरी इंटरनेट यूजर्सपेक्षा जास्त असेल. हे लक्षात घेऊन डिजिटल कन्टेंट आणि व्हिडिओवरही लक्ष केंद्रीत केल्याचं त्यांनी सांगितलं.   

दरम्यान, चित्रपट (बॉलिवूड), टीव्ही, वेब, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने राज्यात 'मीडिया हब' तयार करणं गरजेचं असल्याचं मत शाहरुख खाननं या चर्चासत्रात मांडलं. मीडिया हे क्षेत्र वेगाने वाढत असून त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची ताकद मीडियामध्ये असल्याचा विश्वास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रRishi Dardaऋषी दर्डाbusinessव्यवसायMediaमाध्यमे