शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

गारठा होतोय कमी, अनेक शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 03:13 IST

अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे.

मुंबई : अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याने दिवसाच्या हवेतील गारवा कमी झाला असून, रात्रीच्या हवेत मात्र किंचित गारवा आहे. दुसरीकडे राज्यातील शहरांचे किमान तापमानही आता वाढू लागले आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. डहाणू, अहमदनगर, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या शहरांचे किमान तापमान १५ अंशावर पोहोचले आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २२ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.आज मध्य महाराष्टÑात पावसाची शक्यता१३ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१४ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१५ फेब्रुवारी : विदर्भात काही ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१६ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल.

 

टॅग्स :weatherहवामान