शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

खाणकामगारांच्या भटक्या मुलांना शिक्षणाचे ‘वळण’

By admin | Published: December 06, 2015 2:30 AM

भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..?

- प्रवीण गायकवाड,  शिरूर (पुणे)भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..? या विचाराने ६५ वर्षांचा ‘तरुण’ नव्या उभारीने जागा झाला आणि प्रयत्नांची मोट बांधली. त्यांच्या प्रयत्नांतूनच कर्डेलवाडीच्या शाळेमध्ये आता खाणकामगारांची २३ मुले नियमित शिक्षण घेऊ लागली आहेत. सुभाष कुसाळकर हे ६५ वर्षांचे खाणकामगार गेल्या १२ वर्षांपासून कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे रघुनाथ कर्डिले यांच्या दगडखाणीवर काम करतात. कुसाळकरांच्या पाहण्यात कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळा आली. आपण शिकलो नाही; मात्र आपली नातवंडे, समाजाची इतर मुले शिकली तर पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असे कुसाळकर यांना जाणवले.खाणमालक कर्डिले यांनीही कुसाळकरांच्या इच्छेला वाट करून दिली. यामुळे कुसाळकर यांनी नाशिक व बुलढाणा येथे असलेल्या आपल्या कुटुंबाला कर्डेलवाडी येथे बोलावून घेतले. भटकंतीचा नाद सोडून मुलांसाठी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतर खाणकामगारांनीही हाच मार्ग अवलंबला. आता या २३ मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. तीन महिन्यांतच त्यांच्यात झालेला बदल वाखाणण्याजोगा आहे. शिक्षणामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.अन् मुलं लिहू-वाचू लागली!शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका बेबीनंदा सकट या दाम्पत्याने मोठ्या आनंदाने या मुलांना शाळेत प्रवेश दिला. तीन मुले दुसरीत आहेत, तर इतर पहिल्या इयत्तेत शिक्षण घेताहेत.तीन महिन्यांतच या मुलांना लिहिता-वाचता येऊ लागले असून, त्यांचे अक्षरही वळणदार होऊ लागले आहे. एक दिवसही ते शाळेला दांडी मारत नाहीत.