शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आरटीओंवर राहणार नजर, ज्येष्ठ आयएएस अधिकारी नेमा : उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:59 IST

वाहन योग्यता प्रमाणपत्र देताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना नियमांचे पालन करण्यात येते की नाही, याची पाहणी करण्यासाठी एका ज्येष्ठ आयएएस अधिका-याची नियुक्ती करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला.

मुंबई : वाहन योग्यता प्रमाणपत्र देताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना नियमांचे पालन करण्यात येते की नाही, याची पाहणी करण्यासाठी एका ज्येष्ठ आयएएस अधिका-याची नियुक्ती करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला.वाहन योग्यता प्रमाणपत्र देताना केंद्रीय मोटार वाहन कायद्याला धाब्यावर बसविण्यात येते, असा आरोप पुण्याचे रहिवासी श्रीकांत कर्वे यांनी केला आहे. त्यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकार आदेशांचे पालन करत नसल्याने गेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले होते. ‘आम्ही जे काही आदेश दिले आहेत ते रस्ता सुरक्षा व नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन दिले आहेत. मात्र आमच्या आदेशांचे पालन करण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,’ असे न्या. ओक यांनी म्हटले.‘आमच्या आदेशाचे पालन केले जाईल, याची काळजी संबंधित खात्याचे मंत्री घेतील,’ असे न्यायालयाने म्हटले. तसेच आतापर्यंत दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात आले की नाही, हे पाहण्यासाठी मुख्य सचिवांना ज्येष्ठ आयएएस अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. ‘हा अधिकारी आदेशांचे पालन होते की नाही, एवढेच पाहणार नाही तर आरटीओंमध्ये वाहन योग्यता प्रमाणपत्र देताना किंवा नूतनीकरण करताना नियमांचे पालन करण्यात येते की नाही, याकडेही लक्ष देईल. तसेच सोलापूरचा पोलीस पुण्यातील आरटीओमध्ये येऊन कोणताही अधिकार नसताना वाहनांना वाहन योग्यता प्रमाणपत्र द्यायचा, त्याची व या घटनेची चौकशीही हा अधिकारी करेल. आम्हाला पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती करायची नाही,’ असे म्हणत न्यायालयाने संबंधित अधिकाºयाला १९ डिसेंबरपर्यंत सीलबंद अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.तसेच याचिकाकर्ते श्रीकांत कर्वे यांना एक लाख रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला. ‘खरे तर हे काम सरकारचे होते. मात्र याचिकाकर्त्यांनी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून रस्ता सुरक्षा व नागरिकांच्या सुरक्षेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्यांचे वैयक्तिक हित नाही. त्यांना या याचिकेसाठी व माहिती मिळवण्यासाठी खर्च आला असेल. त्यामुळे त्यांना एक लाख रुपये द्यावेत,’ असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टRto officeआरटीओ ऑफीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार