शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

राज्यातील सरकार जास्त काळ टिकणार नाही: लोणीकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 14:31 IST

मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे.

मुंबई : मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड आणि उजनी धरणातून लातूर शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या घोषणेचे काय होणार याची चिंता लातूरकरांना लागली आहे. तर उजनी धरणातून लातूरसाठी पाणी मिळणारी योजना बंद केल्यास हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

लातूर येथे पत्रकारांशी बोलताना लोणीकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला उजनीचे पाणी देण्याची घोषणा केली. बोगद्यातून पाणी आणण्याचा निर्णय सुद्धा झाला. त्या कामाचे डिझाईन तयार झाले. मात्र या सरकराने हे काम थांबवल असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला.

तर लातूरच्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतीला पाणी देणं गरजेचे आहे. त्यामुळे लातूर येथील पाणी पुरवठ्याचा विचार करून आणि नेहमीची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनीचे पाणी आणण्याची योजना थांबवू नये अशी सरकारला विनंती आहे. त्यांनी जर हे काम थांबवलं, तर हे सरकार फार काळ चालणार नाही, असा खोचक टोला लोणीकर यांनी सरकाराला लगावला.

तसेच ह्या सरकारनं हे काम थांबवलं तर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर ही योजना आम्ही पूर्ण करू असेही लोणीकर म्हणाले. लातूर येथे झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.