शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

राज्यातील सरकार जास्त काळ टिकणार नाही: लोणीकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 14:31 IST

मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे.

मुंबई : मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड आणि उजनी धरणातून लातूर शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या घोषणेचे काय होणार याची चिंता लातूरकरांना लागली आहे. तर उजनी धरणातून लातूरसाठी पाणी मिळणारी योजना बंद केल्यास हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

लातूर येथे पत्रकारांशी बोलताना लोणीकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला उजनीचे पाणी देण्याची घोषणा केली. बोगद्यातून पाणी आणण्याचा निर्णय सुद्धा झाला. त्या कामाचे डिझाईन तयार झाले. मात्र या सरकराने हे काम थांबवल असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला.

तर लातूरच्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतीला पाणी देणं गरजेचे आहे. त्यामुळे लातूर येथील पाणी पुरवठ्याचा विचार करून आणि नेहमीची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनीचे पाणी आणण्याची योजना थांबवू नये अशी सरकारला विनंती आहे. त्यांनी जर हे काम थांबवलं, तर हे सरकार फार काळ चालणार नाही, असा खोचक टोला लोणीकर यांनी सरकाराला लगावला.

तसेच ह्या सरकारनं हे काम थांबवलं तर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर ही योजना आम्ही पूर्ण करू असेही लोणीकर म्हणाले. लातूर येथे झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.