शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

विकासाला विरोध म्हणजेच राजकारण असं उद्धव ठाकरे समजतात; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 06:44 IST

काँग्रेसपेक्षा ठाकरेंकडून अल्पसंख्याकांचे अधिक लांगुलचालन

श्रीमंत माने/विकास मिश्रनागपूर : उद्धव ठाकरेंना विकास हा विषयच समजत नाही. विकासाला विरोध म्हणजेच राजकारण, असे ते समजतात. त्याचप्रमाणे भाजपला विरोधाच्या नादात आता त्यांनी हिंदुत्व पूर्णपणे सोडले असून, ते अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यात काँग्रेसच्याही पुढे गेले आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर फडणवीस हे शुक्रवारी रात्री उशिरा ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, समृद्धी महामार्ग, मुंबईचा कोस्टल रोड, अटल सेतू अशा विकास प्रकल्पांना उद्धव ठाकरे यांनी विरोध केला, मच्छीमारांना उचकावण्याचा अपयशी प्रयत्न केला. कामे पूर्ण झाल्यानंतर मात्र श्रेय घेण्यासाठी पुढे आले. नाणार येथील रिफायनरीला त्यांच्या विरोधामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आणि ते आता वाढवण बंदरालाही विरोध करीत आहेत. हा केवळ विरोधासाठी विरोध आहे. 

आमच्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले हा आरोप चुकीचा आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्यानुसार, पुत्रप्रेमामुळे आंधळे झालेले ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व इतरांचे पंख कापले, तर मुलीच्या राजकारणासाठी शरद पवारांनी अजितदादांना संधी दिली नाही. त्याला कंटाळूनच दोघांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजकारणात आम्ही साधूसंत बनण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे आम्ही त्या संधीचा लाभ घेतला इतकेच, असे ते म्हणाले.

ठाकरे व पवार हे ही बाब मान्य करीत नाहीत. उलट या मुद्द्याचा उपयोग काँग्रेसला हतोत्साहीत करण्यासाठी करतात. काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. सांगली, भिवंडी किंवा मुंबईतल्या हक्काच्या जागाही काँग्रेसला मिळाल्या नाही. ठाकरे अल्पसंख्याक लांगूलचालनाबाबत काँग्रेसशी स्पर्धा करीत आहेत. मराठी-मुस्लीम मतांच्या बळावर महायुतीला पराभूत करू शकू, अशा भ्रमात ते आहेत. मराठी मते आमच्याकडेही आहेत, हे ते विसरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कुरघोडी नव्हे मोठ्या भावाच्या भूमिकेतमहायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मान्य आहे. आम्हा तिघांमध्ये समन्वय तसेच एकवाक्यता असल्याने महायुतीबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. लोकसभेच्या जागावाटपात काही ठिकाणी थोडाबहुत पेच असला, तरी त्यामुळे राज्यभरात चुकीचा संदेश गेला नाही. बारामतीत आम्ही एकजुटीने लढत आहोत. माढात आमची लढाई स्वकीयांशीच आहे. 

उत्तम जानकर मोहिते-पाटलांसोबत गेले तरी कार्यकर्ते सोबत येणार नाहीत. त्याचा फायदा महायुतीला होईल. महायुतीत मोजक्या जागांवर पेच आहे. तो आज-उद्या सुटेल. नाशिकचा पेच छगन भुजबळांनी माघार घेऊन सोडविला, असे फडणवीस म्हणाले.

देशभर पंतप्रधान मोदींची लाटगेल्या दहा वर्षांमधील विविध आघाड्यांवरील सरकारची कामगिरी हाच विजयाचा मंत्र आहे. देशभर मोदी यांची लाट आहे. सर्वेक्षणांमध्ये ती सापडत नाही. विशेषत: सर्व्हेमध्ये महिलांची मते फारशी घेतली जात नाहीत आणि तिथेच मोदींचा प्रभाव अधिक आहे.

आदित्यला सीएम म्हणून तयार करेन अन् दिल्लीत जाईन असे फडणवीस म्हणाले होते!देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की ते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील; पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा नवा दावा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंबाबत आश्वस्त केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ते म्हणाले, अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपाचा मुख्यमंत्री होईन, हे अमित शाहांसोबतच्या चर्चेत ठरले होते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४