शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत कुलकर्णी यांचे निधन

By admin | Updated: February 2, 2017 18:19 IST

पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारे ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 2 - अत्यंत परखड आणि तटस्थ पण तितक्याच लालित्यपूर्ण शैलीत लेखन करत पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारे ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नाशिक येथील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.३) सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, दोन विवाहित मुली मुग्धा शहा व प्राजक्ता जडे, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे. हेमंत कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने कॉलेजरोडवरील विजन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी २.५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी कॉलेजरोडवरील पाटील लेन नंबर ४ मधील ‘पुष्कराज’ या निवासस्थानापासून निघणार आहे. मूळचे अहमदनगरनिवासी असलेल्या हेमंत कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे दादा चौधरी विद्यालयात झाले. नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली होती. पत्रकारितेची वाट चोखाळणाऱ्या कुलकर्णी यांनी थेट मुंबई गाठली आणि लोकसत्तामधून त्यांनी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. लोकसत्ताचे माजी संपादक कै. विद्याधर गोखले यांचे बोट धरत त्यांची वाटचाल सुरू झाली आणि एक विलक्षण अशी शैली आत्मसात करत कुलकर्णी यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ठसा उमटविला.मुंबईनंतर कुलकर्णी यांनी १९८२-८३ पासून नाशिक येथे लोकसत्ताच्या जिल्हा प्रतिनिधीपदाची सूत्रे स्वीकारली. लोकसत्तामधील त्यांनी चालविलेले ‘वेध उत्तर महाराष्ट्राचा’ हे सदर विशेष लोकप्रिय ठरले होते. समाजातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या कुलकर्णी यांचे ‘भाष्य’ स्तंभलेखनही गाजले. डिसेंबर २००३ मध्ये त्यांनी ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेरा वर्षांपासून ‘लोकमत’मध्ये कार्यरत असलेल्या कुलकर्णी यांची गेल्याच वर्षी सहयोगी समूह संपादकपदी नियुक्ती झाली होती. पत्रकाराने समाजात वावरताना आणि प्रसंगी लोकांशी समरस होतानाही आपली तटस्थ भूमिका अबाधित ठेवली पाहिजे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण त्रयस्थाच्या भूमिकेतून अत्यंत परखडपणे केले पाहिजे, अशी धारणा घेऊन पत्रकारिता करणाऱ्या कुलकर्णी यांचा लेखनसंग्रह ‘परखड’ या शीर्षकाखाली जून २००१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. एक लिहिता संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी, अरुण टिकेकर या मान्यवर संपादकांचा त्यांना सहवास लाभला होता. साहित्य क्षेत्राबाबतही त्यांची विशेष रुची होती. पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक संस्थांनी गौरव केला होता. कुलकर्णी यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.