शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईत रंगणार ‘लोकमत वॉटर समिट २०१७’

By admin | Updated: July 10, 2017 06:05 IST

वातावरणाचा बदलता पोत लक्षात घेता पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलसंधारण हे आजच्या घडीला सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. वातावरणाचा बदलता पोत लक्षात घेता पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ म्हणीप्रमाणे गावांसह शहराशहरांतून पाणी बचत करत ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावण्याची गरज आहे. याचाच सारासार विचार करत, एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत वॉटर समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत अंधेरी पूर्वेकडील ‘आयटीसी मराठा’ येथे मंगळवार, ११ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता ‘वॉटर समिट’ला प्रारंभ होणार आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत समिटसाठी नोंदणी होईल. दुपारी १.३० वाजता समिटचे उद्घाटन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते होणार आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. ‘तरुण भारत संघा’चे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राज्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. ‘लोकमत’ मीडियाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन करतील. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता हे देखील या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्रानंतर राज्यभर जलसंधारणासाठी कार्यरत असलेल्या दिग्गजांचा गौरव होईल. त्यानंतरच्या सत्रात गिरीष महाजन, राम शिंदे, बबनराव लोणीकर यांना ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर बोलते करतील. पहिल्या सत्रात ‘जलसंधारणातील सध्याची आव्हाने आणि शासनाचे प्रयत्न’ या विषयावरील चर्चेत राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’चे संस्थापक आबिद सुरती, ‘महिंद्रा ग्रुप’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर अनिरबन घोष, ‘गोवर्धन इको व्हिलेज’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर निमाई लीला दास आणि ‘युनिसेफ इंडिया’चे वॉश स्पेशलिस्ट युसूफ कबीर आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे सूत्रसंचालन ‘द ंिहंदू’ वृत्तपत्राचे निवासी संपादक सचिन कालबाग हे करतील. दुसऱ्या सत्रात ‘स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी : निरोगी जनतेसाठी आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे संचालक डॉ. सतीश उम्रीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, ‘सिडको’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि ‘टेरी’चे सल्लागार जी. एस. गिल, ‘वॉटर फॉर पीपल’चे संचालक मीना नरुला आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे संचालन ‘सेफ्टी वॉटर उपक्रमा’च्या उपाध्यक्ष पूनम सेवक या करतील.तर तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात ‘पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी व्यावहारिक उपाय’ या विषयावर चर्चासत्र रंगेल. त्यात राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ ढवळे, ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष अमला रुईया, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या विकास विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. आर.सी. बिंदल, ‘अंबुजा सिमेंट’च्या सीएसआरचे अध्यक्ष पिरल तिवारी, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवरांचा सहभाग असेल.>मान्यवरांची उपस्थितीया समिटला राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. ‘तरुण भारत संघा’चे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राज्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती असेल.