शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘लोकमत’ स्टिंग; चार दिवसांत हजारो लिटर साठ्याची रात्री वाहतूक,कारवाईच्या धास्तीने कंपन्यांना कीटकनाशके परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 03:41 IST

शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली

सुरेंद्र राऊत यवतमाळ : शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली असून चार दिवसांत हजारो लिटर कीटकनाशके रात्री हलविण्यात आले. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून हे वास्तव उघडकीस आले.फवारणीच्या बळीनंतर मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाºयांनी यवतमाळात धाव घेतली. चौकशीत कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर यंत्रणा स्वत:ला निर्दोष असल्याचे दाखविण्यासाठी धडपड करत आहे. आतापर्यंत सात जणांवर कारवाई करून कृषी यंत्रणा पुन्हा थंडावली आहे. त्याचा फायदा कृषी सेवा केंद्रांनी कीटकनाशकांनी भरलेले गोदाम रिकामे करण्याचा सपाटा लावला आहे.दिवसभर दुकानाचे शटर बंद करून कीटकनाशकांचे पॅकिंग केले जाते. रात्री १० वाजेनंतर ती हलविली जातात. चार दिवसांपासून हा प्रकार सर्वत्र सुरू आहे. बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दत्त चौक परिसरात एका कृषी केंद्रासमोर एका मेटॅडोअरमध्ये कीटकनाशके भरली जात होती. चौकशी केल्यानंतर उरलेले बियाणे व कीटकनाशके कंपनीला परत पाठवित असल्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र शटर बंद करून काही लोक आतमध्ये पॅकिंगचे काम करीत होते. परंतु माहिती देताना त्यांची बोबडी वळल्याचे दिसत होते.कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित : कीटकनाशक विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू झाल्याने कंपन्यांचे मार्केटिंग अधिकारी, कर्मचारीसुद्धा यवतमाळात मुक्कामी होेते. त्यांच्याच सल्ल्यानुसार हा माल कंपन्यांकडे परत पाठविला जात आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी माल भरताना हे अधिकारीही तेथे उपस्थित होते. विशेष म्हणजे कारवाईच्या भीतीने अनेक मान्यताप्राप्त कीटकनाशकांचा साठा देखील कंपन्यांना परत पाठविण्याचा सपाटा लावला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार