शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Sarpanch Awards 2018 : नाथराव रामराव बंडे यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’(स्वच्छता) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 14:32 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी गावचे सरपंच नाथराव रामराव बंडे यांना प्रदान करण्यात आला. 

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी गावचे सरपंच नाथराव रामराव बंडे यांना प्रदान करण्यात आला. 

गट - स्वच्छतासरपंचाचे नाव - नाथराव रामराव बंडेगाव - चिमाची वाडीतालुका - उद्गीरजिल्हा - लातूर

गावात स्वच्छतेचे नियोजन...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील चिमाची वाडी हे साधारण साडेपाचशे लोकसंख्येचे लहानसे गाव! केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करण्यापूर्वीपासूनच या स्वछतेचा वसा घेतला आहे. पाणंदमुक्ती, प्लास्टीकमुक्ती असे उपक्रम नेटाने राबवित गावाने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावात ७९ घरे असून त्यांच्यासाठी ७९ शौचालयेही बांधण्यात आली आहे. त्यात पाच सार्वजनिक शौचालयांचाही समावेश आहे. गाव पाणंदमुक्त करण्यासाठी केवळ शौचालये बांधून चालत नाही, तरग्रामस्थांना त्याच्या नियमित वापराची सवयही लावणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंड बसविला. त्यामुळे हळूहळू लोकांच्या सवयींमध्ये बदल होऊन गाव १०० टक्के पाणंदमुक्त झाले. गावात आरओ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे ५ रुपये प्रति जार दराने ना नफा, ना तोटा तत्त्वावर पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येते. तसेच बंदिस्त गटारांद्वारे सांडपाणी शेतात सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याचा सिंचनासाठी पुनर्वापर होतो.गावाला २००५-०६ साली तत्कालीन राष्टÑपती डॉ. ण्. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गतही चिमाचीवाडीचा राज्यात तिसरा क्रमांक होता. तसेच यशवंत पंचायत राज पुरस्कार, स्वच्छ शाळा- सुंदर शाळा सानेगुरुजी पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, आण्णासाहेब खेडकर पुरस्कार, सलग तीन वेळा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार आदी पुरस्कारांनी गावाला गौरविण्यात आले आहे. याचे श्रेय सरपंच नाथराव रामराव बंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना आहे. 

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र