शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Lokmat Sarpanch Awards 2018 : नाथराव रामराव बंडे यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’(स्वच्छता) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 14:32 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी गावचे सरपंच नाथराव रामराव बंडे यांना प्रदान करण्यात आला. 

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी गावचे सरपंच नाथराव रामराव बंडे यांना प्रदान करण्यात आला. 

गट - स्वच्छतासरपंचाचे नाव - नाथराव रामराव बंडेगाव - चिमाची वाडीतालुका - उद्गीरजिल्हा - लातूर

गावात स्वच्छतेचे नियोजन...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील चिमाची वाडी हे साधारण साडेपाचशे लोकसंख्येचे लहानसे गाव! केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करण्यापूर्वीपासूनच या स्वछतेचा वसा घेतला आहे. पाणंदमुक्ती, प्लास्टीकमुक्ती असे उपक्रम नेटाने राबवित गावाने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावात ७९ घरे असून त्यांच्यासाठी ७९ शौचालयेही बांधण्यात आली आहे. त्यात पाच सार्वजनिक शौचालयांचाही समावेश आहे. गाव पाणंदमुक्त करण्यासाठी केवळ शौचालये बांधून चालत नाही, तरग्रामस्थांना त्याच्या नियमित वापराची सवयही लावणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंड बसविला. त्यामुळे हळूहळू लोकांच्या सवयींमध्ये बदल होऊन गाव १०० टक्के पाणंदमुक्त झाले. गावात आरओ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे ५ रुपये प्रति जार दराने ना नफा, ना तोटा तत्त्वावर पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येते. तसेच बंदिस्त गटारांद्वारे सांडपाणी शेतात सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याचा सिंचनासाठी पुनर्वापर होतो.गावाला २००५-०६ साली तत्कालीन राष्टÑपती डॉ. ण्. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गतही चिमाचीवाडीचा राज्यात तिसरा क्रमांक होता. तसेच यशवंत पंचायत राज पुरस्कार, स्वच्छ शाळा- सुंदर शाळा सानेगुरुजी पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, आण्णासाहेब खेडकर पुरस्कार, सलग तीन वेळा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार आदी पुरस्कारांनी गावाला गौरविण्यात आले आहे. याचे श्रेय सरपंच नाथराव रामराव बंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना आहे. 

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र