शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळकांनी पैसे जमा केले पण शिवरायांची समाधी बांधली नाही; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:51 IST

गेल्या ६० वर्षांमध्ये शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे राज ठाकरेंचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

ठाणे – मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली. पवारांनी जातीजातीत द्वेष निर्माण करण्याचं राजकारण केले असा आरोप राज ठाकरेंनी केला. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका करत तुमचे जे काय राजकीय विचार आहेत ते शरद पवारांच्या सिल्व्हर ओकच्या दारापुढे संपत आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा उत्तम वकृत्व नेता नाही म्हणून तुम्ही काय शरद पवार यांना टार्गेट करत आहेत का? मिळणार काय? यात महाराष्ट्र अनेक विचार करत आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे उगाच घडलेला नाही. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकारक याठिकाणी तयार झाले जमले तर चैत्य भूमीवर जाऊन या? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याची निर्मिती कशी झाली ते बघा?. अनेक संतांची लिखाण वाचा. धर्मामध्ये संघर्ष लावून आता तुम्हाला काही होत नाही .आता तुम्हाला जाती पेटवायचे आहेत का? अनेक लोकांना महागाई नोकऱ्यांचा प्रश्न पडलेला आहे त्याच्याशी संघर्ष करत संसार चालत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मला आनंद आहे गेल्या ६० वर्षांमध्ये शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे राज ठाकरेंचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला. राजकीय प्रवेशानंतर त्यांच्या काकांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र त्यांची मैत्री होती मात्र पुतण्या आता द्वेषापोटी आणि त्यात राजकारणात भीष्म पितावरती टीका करणाऱ्यांवर हेडलाईन मिळवली जाते असं सांगत आव्हाडांनी राज ठाकरेंना फटकारलं आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार १९२६ साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली .पत्र व्यवस्थित वाचा असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार