शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 08:40 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे

मुंबई - Survey on Loksabha Election ( Marathi News ) लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये ३ राज्यात भाजपानं जबरदस्त यश पटकावलं. या विजयामुळे भाजपा नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळणार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी की एनडीए यात कोण बाजी मारेल हा मोठा प्रश्न आहे. यात एबीपी या हिंदी वृत्तवाहिनीनं सी वोटरच्या माध्यमातून जनतेच्या मनातील कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यात कोणाचा विजय होईल आणि कुणाच्या पदरी निराशा येईल यावर देशातील ५ राज्यातील आकडे हैराण करणारे आहेत. या ५ राज्यात पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण २२३ लोकसभा जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे. 

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याचं दिसून आले. त्यात सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना युती मोडली आणि राज्यात पहिल्यांदाच कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी बनली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले. परंतु अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार भाजपासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.राज्यात पुन्हा भाजपा आघाडीचं सरकार आले. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. अजित पवारांसह ४३ आमदार सत्तेत महायुतीसोबत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील प्रमुख २ प्रादेशिक पक्षात पडलेल्या या फुटीमुळे राजकीय चित्रच पालटले. अशातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे. त्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाlok sabhaलोकसभाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी