शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 08:40 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे

मुंबई - Survey on Loksabha Election ( Marathi News ) लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये ३ राज्यात भाजपानं जबरदस्त यश पटकावलं. या विजयामुळे भाजपा नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळणार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी की एनडीए यात कोण बाजी मारेल हा मोठा प्रश्न आहे. यात एबीपी या हिंदी वृत्तवाहिनीनं सी वोटरच्या माध्यमातून जनतेच्या मनातील कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यात कोणाचा विजय होईल आणि कुणाच्या पदरी निराशा येईल यावर देशातील ५ राज्यातील आकडे हैराण करणारे आहेत. या ५ राज्यात पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण २२३ लोकसभा जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे. 

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याचं दिसून आले. त्यात सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना युती मोडली आणि राज्यात पहिल्यांदाच कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी बनली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले. परंतु अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार भाजपासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.राज्यात पुन्हा भाजपा आघाडीचं सरकार आले. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. अजित पवारांसह ४३ आमदार सत्तेत महायुतीसोबत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील प्रमुख २ प्रादेशिक पक्षात पडलेल्या या फुटीमुळे राजकीय चित्रच पालटले. अशातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे. त्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाlok sabhaलोकसभाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी