शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 16:08 IST

loksabha Election Result - राज्यातील निकालात महायुतीला बसलेला फटका आणि त्याचं चिंतन करण्यासाठी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर भाजपानं आज पदाधिकारी, आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पराभवाचं विश्लेषण करत विरोधकांनी जे नॅरेटिव्ह तयार केलं त्यात ते यशस्वी झाले असं सांगत आगामी काळात ताकदीने जिंकू असं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींना जनतेनं समर्थन दिले, तिसऱ्यांदा सरकार आलं. ओडिशा, आंध्र प्रदेश याठिकाणी आपलं सरकार आलं. मागील ३ निवडणुका मिळून जेवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा या एका निवडणुकीत मिळाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मते ४३.०९ टक्के तर महायुतीला मिळालेली मते ४३.०६ टक्के आहेत. मतांमध्ये जास्त फरक नाही. पण त्यांना ३१ आणि आपल्याला १७, केवळ २ लाख मते महाविकास आघाडीला मिळालीत. मुंबईचा विचार केला तर महाविकास आघाडीला २४ लाख आणि महायुतीला २६ लाख मते आहेत. याचं विश्लेषण केले तर आपण केवळ ३ पक्षांशी लढत नव्हतो तर एका खोट्या नकारात्मक नॅरेटिव्हला आपण रोखू शकलो नाही असं त्यांनी सांगितले. 

कोणते ४ नॅरेटिव्ह? 

१) संविधान बदलणार 

भाजपा सत्तेत आल्यास संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला त्याचा निकालावर परिणाम झाला. पहिल्या ३ टप्प्यापर्यंत आपण गाफील राहिलो. त्यामुळे या टप्प्यातील २४ जागांमध्ये केवळ ४ जागा आपल्याला आहेत. दलित, आदिवासी समाजात दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात झाला. जेव्हा जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नेता निवडीपूर्वी संविधानाच्या पाया पडले. संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होतायेत. त्यामुळे पुढील १ वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव देशात साजरा केला जाणार आहे असं मोदींनी सांगितले. त्यामुळे आता हा नॅरेटिव्ह जास्त काळ चालणार नाही. 

२) पक्ष फोडाफोडी

जर त्यांच्या यशाचं विश्लेषण केले तर त्यांना कुठे मते मिळाली आणि कुठे नाही यातून हा नॅरेटिव्ह किती खोटा आहे लक्षात येईल. विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा नॅरेटिव्ह तयार केला. पण आश्चर्य वाटतं मराठा समाजाला दोन्ही वेळेला आपण आरक्षण दिले, महामंडळे, अनेक योजना या आपल्या काळातच झाल्या. मराठा समाजाचा फटका बसला पण ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मते गेली. याचा अर्थ नॅरेटिव्ह तयार करण्यात विरोधक यशस्वी झाले. पण आपला मतदार सगळा गेला असता तर ४३ टक्के मते मिळाली नसती. 

३) महाराष्ट्रातले उद्योग पळवले 

महाराष्ट्रातले उद्योग पळवले हा तिसरा नॅरेटिव्ह तयार केला. प्रत्यक्ष आकडेवारी पाहिली तर २०२२-२३, २३-२४ या दोन्ही वर्षात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात गुजरात, कर्नाटक पुढे होते. परंतु आपल्या काळात गुजरात-कर्नाटक यांचं मिळूनही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली. मात्र रोज खोटे बोलायचे, उद्योग पळवले बोलायचे जर उद्योग पळाले असतील तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात-कर्नाटकपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे कशी आली असती?

४) उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती 

उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती असती तर मुंबई, कोकणात दिसायला हवी होती. ठाण्यापासून कोकणापर्यंत उबाठाला एकही जागा मिळाली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर यात एकही जागा मिळाली नाही. मुंबईतल्या जागा कुणाच्या भरवशावर मिळाल्या हे आपल्याला माहिती आहे. मराठी माणसांच्या मतांवर निवडून आले नाहीत. मराठी माणसांनी मत दिलं असते तर दक्षिण मुंबईत वरळीत जिथं आदित्य ठाकरे आमदार आहेत केवळ ६ हजार मते अधिक मिळाली. शिवडीत ३०-४० हजार मताधिक्य घेऊ शकले नाहीत. मराठी माणसाने मतदान केले असते तर मराठी बहुल भागात उद्धव ठाकरेंना फार मोठे मताधिक्य मिळाले नाही. परंतु विशिष्ट समाजाच्या मतांवर एखाद्या विधानसभेत प्रचंड मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या जागा आल्या. कोकणात उद्धव ठाकरेंना लोकांनी हद्दपार केले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल