शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : भिवंडीत पुन्हा कमळ फुलले, कपिल पाटील यांचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 00:38 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत भाजपचे कपिल पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत मोदीलाटेचा करिष्मा चालणार नाही.

- मुरलीधर भवार

भिवंडी - गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत भाजपचे कपिल पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत मोदीलाटेचा करिष्मा चालणार नाही. त्यामुळे त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागणार, अशा वल्गना विरोधकांकडून केल्या जात होत्या. प्रत्यक्षात विकासकामांच्या जोरावर पाटील यांनी पुन्हा एकदा भिवंडीत भाजपचे कमळ फुलवले आहे. पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव करत आपला विजय कायम राखला आहे. निवडणुकीच्या प्रचारातही नियोजन असल्याने कुठेही गोंधळ उडाला नाही. सोशल मीडियावरही जोरदार प्रचार करण्यात आला होता.

पाटील यांची भाजपने सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर केली. मात्र, या मतदारसंघातून शिवसेनेचे बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेच्या नेत्यांकडून म्हात्रे यांच्यावर दबाव आणत शिवसेनेने म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याने पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. तरीही, बाळ्यामामा पाटील यांच्याविरोधात काम करत टावरे यांना विजयासाठी मदत करणार, अशी चर्चा होती. बाळ्यामामाची मदत टावरे यांच्या उपयोगाला आली नाही. त्याचबरोबर काँग्रेसच्या तिकिटावर २०१४ मध्ये निवडणूक लढवणारे कुणबीसेनेचे विश्वनाथ पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचीही बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आले होते. त्यात सगळ्यात मोठा पुढाकार खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने पाटील यांनी माघार घेतली.

पाटील व टावरे हे आगरी असल्याने आगरी मतांचे विभाजन होईल, असे बोलले गेले. या विभाजनाचा फटका टावरे यांना बसला. पाटील यांच्या पराभवाला हे मतविभाजन रोखू शकले नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत उच्चशिक्षित व शास्त्रज्ञ आहेत. त्यांना वंचित समाजासह मुस्लिमांची मते मिळतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून केला जात होता. सावंत यांच्या प्रचारासाठी भिवंडीत खुद्द असुद्दीन ओवेसी आले होते. तरीही, मुस्लिम मते वंचितकडे वळली नाहीत.

मुस्लिमबहुल वस्तीतील मतदान हे टावरे यांच्याकडे झुकलेले होते. मात्र, अन्य मतदारसंघात टावरे यांना ज्या पद्धतीने मते मिळायला हवी होती, त्या पद्धतीने मते मिळाली नाहीत. कल्याणमधील मनसेकडून टावरे यांना मताधिक्य मिळवून दिले जाईल, असा दावा केला जात होता. मात्र, तो फोल ठरला.
मुस्लिम मतांनी वंचित आघाडी व समाजवादी पार्टीला पसंती दिली नाही. मुस्लिमांच्या मतांनी टावरे यांना साथ दिली, पण ते विजयश्री खेचून आणू शकले नाहीत.

पाटील यांना मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण पश्चिमेतून चांगले मतदान झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा विजयाची मोहर उमटवली. पाटील यांनी भिवंडी मतदारसंघात २२ हजार कोटींची कामे केली होती. ही कामे प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसली, तरी काही ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर काही कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा त्यांच्याकडून केला गेला. केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांना मतदारांनी कौल दिला आहे.

भिवंडीतील पॉवरलूमचा प्रश्न व टोरंटोच्या जाचक वीजबिलाचा प्रश्न निवडणुकीची आचारसंहिता संपताच चर्चा करून सोडवला जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत भिवंडीकरांना दिले होते.

पॉवरलूम ही शहराची जान आहे. त्यावर शहराचे अर्थकारण आहे. या दोन्ही समस्या जनहिताच्या असल्याने त्यावर मिळालेल्या आश्वासनापोटी मतदारांनी पुन्हा एकदा पाटील यांना निवडून दिले असल्याचे बोलले जात आहे.

पुढील पाच वर्षांत पाटील यांना भिवंडीतील अपुऱ्या असलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. तसेच मेट्रोसाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे.

अंतर्गत वादाचा टावरे यांना फटका

टावरे हे २००९ मध्ये खासदार होते. पक्षाने २०१४ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या उमेदवारीविषयी अन्य पक्षाने जो काही संभ्रम निर्माण केला होता, त्याचा फटका टावरे यांना बसला. विशेष म्हणजे टावरे यांनी जोरदार प्रचार केला नाही.

तसेच त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभाही झाल्या नाहीत. काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादामुळे टावरे यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघाकडे लक्ष दिले असते, तर टावरे यांना कदाचित फायदा होऊ शकला असता.

5 कारणे विजयाची

२२ हजार कोटींची विकासकामे मतदारसंघात केली.
केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मतदारसंघातील लाभार्थ्यांना मिळवून दिला.
कुणबीसेना, श्रमजीवी संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचा फायदा झाला.
मतदारांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नियोजनबद्ध प्रचार करण्यात आला.

सुरेश टावरे यांच्या पराभवाची ५ कारणे

भिवंडीत काँग्रेसम पक्षामधील गटातटांच्या राजकारणाचा फटका बसला.
तिकीट उशिरा मिळाल्याने नियोजन व जनसंपर्कात कमी पडलो.
मुरबाड व शहापूर येथे १२ महिने काम करूनही अपेक्षित मते मिळाली नाहीत.
लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाने काँग्रेसचे काम केले नाही.
कल्याण व मुरबाड विधानसभा क्षेत्रांत प्रतिसाद कमी मिळाला.

मित्रपक्षांनीही कामे केली नाहीत.
माझी काम करण्याची पद्धत ज्यांना आवडली, त्यांनी मला मतदान केले. काही उमेदवारांबाबत मला मतदारांकडून तक्रारी आल्या. शहापूर व मुरबाड येथील जनसंपर्कामधून मतमोजणीत आघाडी होती. परंतु, अपेक्षित मते मिळाली नाहीत. तर, भिवंडीत गटातटांच्या राजकारणामुळे ५० टक्के मते मिळत नसतात. त्यामुळे भिवंडी बाहेर मते वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपेक्षित मते मिळाली नाहीत. काही कार्यकर्त्यांनी कामे केली नाही, हे मतमोजणीतून दिसून आले. ही बाब पराभवास कारणीभूत ठरली आहे. तसेच मित्रपक्षांनीही कामे केलेली नाहीत. मात्र, भिवंडीतील पारंपरिक मतदारांनी मते दिली. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असती, समाधानकारक मते मिळाली असती, तर वेगळा निकाल मिळाला असता.
- सुरेश टावरे, पराभूत उमेदवार, काँग्रेस

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbhiwandi-pcभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस