शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

महाराष्ट्राने BJP ला नाकारलेलं नाही; फडणवीसांनी आकडेवारी दिली, पराभवाची कारणंही सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 15:11 IST

"देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल."

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवढणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपच्या नेतृत्वातील NDA ला अपेक्षित यश मिळाले नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल राजस्थान आणि महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसला. या निकालानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्विकारली. तसेच, या निवडणुकीत भाजप आणि विरोधकांना मिळालेल्या मतांची संपूर्ण आकडेवारीही मांडली.

विरोधकांनी युकीचा नरेटिव्ह सेट केलाफडणवीस म्हणाले की, "देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. विरोधकांनी मिळून एक मोठा नरेटिव्ह सेट केला होता, त्याचा आम्हाला फटका बसला. पण, तरीदेखील भाजपच देशात सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल. नक्कीच महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही."

"राज्यात आमची लढाई महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती. त्यांनीदेखील संविधान बदलणार, मराठा आंदोलन आणि अल्पसंख्यांकाबाबत एक नरेटिव्ह तयार केला. काही प्रमाणात अल्पसंख्यकाचे ध्रुवीकरण झाले, त्याचाही आम्हाला फटका बसला आहे. शिवाय, आमच्या काही उमेदवारांबाबत अँटी इन्कबन्सी होती, ती आम्ही ओळखू शकलो नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे स्थानिक मुद्दे होते, त्याचा मतांवर परिणाम झाला. काही भागांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चुकीचा नरेटिव्ह तयार करण्यात आला. विशेषत: मराठवाड्यात आम्ही खुप मागे पडलोत. पण, मतदारांचा जनादेश मान्य करुन आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत," असे फडणवीस म्हणाले.

अशी आहे मतांची आकडेवारी यावेळी फडणवीसांनी महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांची आकडेवारी मांडली ते म्हणाले की, "आम्ही नक्कीच खुप कमी जागा जिंकल्या आहेत, पण एकूण महाविकास आघाडीला 43.91 टक्के मतदान मिळाले अन् आम्हाला 43.60 टक्के मिळले. अर्धा टक्क्यापेक्षा कमी फरकाने आम्हाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. मतांची संख्या बघितली तर, त्यांना 2 कोटी 50 लाख मते मिळाली अन् आम्हाला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. म्हणजेच, अवघ्या 2 लाख 3 हजार 192 मतांनी आमचा पराभव झाला आहे." 

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

"फक्त मुंबईचा विचार केला, तर मुंबईत विरोधकांना 24 लाख मते अन् आम्हाला 26 लाख मते मिळाली आहेत. तसेच, आमच्या 8 जागा चार टक्क्यांपेक्षा कमी फरकाने आणि 6 जागा फक्त 30 हजारांच्या फरकाने गमावल्या आहेत. काही जागा तर 2-4 हजारांच्या फरकाने हरलो आहोत. याचाच अर्थ ही निवडूक अतिशय ठासून झाली आहे. थोडीफार कमतरता आल्यामुळे आम्ही मागे राहिलो. 2019 मध्ये आम्हाला 27.83 टक्के मते मिळाली होती अन् 23 जागा  जिंकल्या होत्या. आता दीड टक्क्याने कमी आहोत अन् 9 वर आलो आहोत. 2019 मध्ये काँग्रेसला 16 ट्केक मते आणि एक जागा होती, आता 17 टक्के आणि 14 जागा झाल्या आहेत. याचा अर्थ आम्हाला जनतेते नाकारले असे होते नाही. आम्ही अगदी थोड्या फरकाने पराभूत झालो आहोत," असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस