शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

फडणवीसांचे भाषण म्हणजे केवळ घोषणांचा महापूर : बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:25 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण ऐकलं तर असं वाटतं की, चार ही बाजूंनी नदी वाहत असून पूर आल्यासारखं वाटत. मुख्यमंत्री हे केलं ते केलं असं सांगतात की माणूस पागल होईल, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यंत्र्यांची खिल्ली उडवली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहचला आहे. राजकीय नेतेमंडळी उमेदवारांसाठी सभांना हजेरी लावताना दिसत आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू मतदारसंघात ठीक-ठिकाणी सभा घेत आहे. मंगळवारी यवतमाळच्या अकोला बाजार येथे आपल्या भाषणातून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. त्यांचे भाषण म्हणजे, केवळ घोषणांचा महापूर असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण ऐकलं तर असं वाटतं की, चार ही बाजूंनी नदी वाहत असून पूर आल्यासारखं वाटत. मुख्यमंत्री हे केलं ते केलं असं सांगतात की माणूस पागल होईल, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यंत्र्यांची खिल्ली उडवली. तुम्हाला सगळ कळते तरीही मतदान कमळ आणि शिवसेनेलाच करतात असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्याचे कान टोचले.

बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसह नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. मोदी म्हणतात पाच वर्षांत घरा-घरात स्वच्छालय बांधले, पण त्यापेक्षा जर कापसाला योग्य भाव दिला असता तर आम्ही तुमचे गुलाम झालो असतो असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाना साधला. अमरावती-वाशीम मतदार संघातून प्रहार संघटनेच्या वतीने वैशाली येडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. वैशाली येडे वर्गणीच्या जोरावर एसटी बसने प्रवास करून आपला प्रचार करत आहेत. त्यामुळे, येडे यांना मतदार किती साथ देणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBacchu Kaduबच्चू कडू