शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 12:59 IST

Lok Sabha Election 2024 Result: मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये अटीतटीची लढत झाल्याने येथील निकालाकडे सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना उद्देशून पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील लिहितात की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४' करिता आपण सगळ्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. मला आपल्या सगळ्यांचा अभिमान आहेच, परंतु ही लढाई इथेच संपलेली नाही. यासाठीच आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन करत आहे. तुम्ही सर्वांनी जी संयम आणि जी दक्षता विविध टप्प्यात पार पडलेल्या मतदानाच्या कालावधीत बाळगलीत, तोच संयम आणि तीच सतर्कता मतमोजणी संपेपर्यंत आणि विजयाचे प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत आपल्या सगळ्यांना मिळून बाळगायची आहे. या कालावधीत सत्ताधारी पक्षाकडून दिशाभूल करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होईल, परंतु आपण पूर्णपणे दक्ष राहायचे आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील पत्रात पुढे लिहितात की, देशातील लोकसभा निवडणूक मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. अशा स्थितीत सत्ताधा-यांनी हा एक्झिट पोलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे आपला स्वार्थ साधायला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांना जवळपास ३०० जागांची आघाडी मिळणार असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचं काम मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही यंत्रणा करत आहेत. ही निव्वळ देशवासियांची फसवणूक असून, मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळणं सुरू झालेलं आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

त्यात जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशात INDIA आघाडीलाच बहुमत मिळणार असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं असतानादेखील अशाप्रकारे सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. कारण, तुम्हाला संभ्रमात टाकून तुमचा उत्साह कमी केला जाऊ शकतो. जेणेकरून तुम्ही दक्ष आणि सक्रिय नसाल आणि ही संधी साधून चंदीगढप्रमाणेच भ्रष्ट अधिकायांना हाताशी घेत मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. मतमोजणीमध्ये सत्ताधारी घोटाळा करणार असल्याची कुठलीच शक्यता नाकारून चालणार नाही. त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना वळी न पडता आपण मतमोजणीच्या दिवशी सतर्क राहणं अधिक गरजेचं आहे, असे जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jayant Patilजयंत पाटीलexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल