शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 12:59 IST

Lok Sabha Election 2024 Result: मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये अटीतटीची लढत झाल्याने येथील निकालाकडे सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना उद्देशून पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील लिहितात की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४' करिता आपण सगळ्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. मला आपल्या सगळ्यांचा अभिमान आहेच, परंतु ही लढाई इथेच संपलेली नाही. यासाठीच आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन करत आहे. तुम्ही सर्वांनी जी संयम आणि जी दक्षता विविध टप्प्यात पार पडलेल्या मतदानाच्या कालावधीत बाळगलीत, तोच संयम आणि तीच सतर्कता मतमोजणी संपेपर्यंत आणि विजयाचे प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत आपल्या सगळ्यांना मिळून बाळगायची आहे. या कालावधीत सत्ताधारी पक्षाकडून दिशाभूल करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होईल, परंतु आपण पूर्णपणे दक्ष राहायचे आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील पत्रात पुढे लिहितात की, देशातील लोकसभा निवडणूक मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. अशा स्थितीत सत्ताधा-यांनी हा एक्झिट पोलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे आपला स्वार्थ साधायला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांना जवळपास ३०० जागांची आघाडी मिळणार असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचं काम मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही यंत्रणा करत आहेत. ही निव्वळ देशवासियांची फसवणूक असून, मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळणं सुरू झालेलं आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

त्यात जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशात INDIA आघाडीलाच बहुमत मिळणार असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं असतानादेखील अशाप्रकारे सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. कारण, तुम्हाला संभ्रमात टाकून तुमचा उत्साह कमी केला जाऊ शकतो. जेणेकरून तुम्ही दक्ष आणि सक्रिय नसाल आणि ही संधी साधून चंदीगढप्रमाणेच भ्रष्ट अधिकायांना हाताशी घेत मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. मतमोजणीमध्ये सत्ताधारी घोटाळा करणार असल्याची कुठलीच शक्यता नाकारून चालणार नाही. त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना वळी न पडता आपण मतमोजणीच्या दिवशी सतर्क राहणं अधिक गरजेचं आहे, असे जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jayant Patilजयंत पाटीलexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल