शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:20 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते.

- ॲड. हर्षल प्रधान(प्रवक्ते, उद्धवसेना) 

भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा, या निश्चयाने महाराष्ट्रातील मतदार मतदान करण्यास उत्सुक होते. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना कोरोनाच्या संकटावर मात करताना, मुंबई-महाराष्ट्रातील जनतेला आपल्या नियोजनबद्ध कामगिरीचा आणि प्रशासनावरील वचक कसा असावा याचा परिचय करून दिला. संकट काळात राज्याच्या प्रमुखाने कसे वागावे, सर्वसमावेशक धोरणे कशी राबवावित याचे उदाहरण रेखाटले. मुंबईतील धारावी, वरळी या वस्त्यांमधील जनता ही कोरोनाच्या काळात किती शिस्तबद्ध नियोजनाने वावरत होती हे जगाने पाहिले आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जगभरात कौतुकही झाले होते. राज्यातील जनतेने याच काळात उद्धव ठाकरे यांना आपल्या परिवारात सामावून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत भाजपने केलेले राजकारण, त्यांचा पक्ष फोडण्याचे, पक्षाचे नाव - चिन्ह काढून घेण्याचे केलेले घृणास्पद कारस्थान महाराष्ट्रातल्या जनतेला रुचले नाही. 

तसेही भाजपच्या विरोधात मुंबई-महाराष्ट्रात वातावरण होतेच. ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत. त्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांचे  विश्लेषण आणि परीक्षण पक्षांतर्गत बैठकीत निश्चितपणे केले जाईल.  

     मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच होती आहे आणि राहणार यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.      ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत.     भाजपला या निकालांनी मात्र ‘गर्वाचे घर खाली’ या म्हणीचा अर्थ निश्चित कळला असावा.     मतदारांनी भाजपचे गर्वहरण करण्याचे ठरवले होतेच आणि तेच या निकालातून स्पष्ट झाले.     उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच महाराष्ट्रातील असली नेते आहेत हेच जनतेने या निकालांनी अधोरेखित केले हे स्पष्ट आहे.  

लढाऊ वृत्ती भावलीउद्धव ठाकरे यांच्याप्रति असणारी सहानुभूतीची लाट जाणवत होती. त्यात उद्धव यांची विनम्रता, सच्चाई आणि सर्वस्व हरपूनही जिद्दीने लढण्याची वृत्ती जनतेला भावली आणि म्हणूनच  उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने मनापासून पाठिंबा देत भाजपचा गर्वाचा वारू रोखण्यात उद्धव यांना साथ देत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना