शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:20 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते.

- ॲड. हर्षल प्रधान(प्रवक्ते, उद्धवसेना) 

भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा, या निश्चयाने महाराष्ट्रातील मतदार मतदान करण्यास उत्सुक होते. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना कोरोनाच्या संकटावर मात करताना, मुंबई-महाराष्ट्रातील जनतेला आपल्या नियोजनबद्ध कामगिरीचा आणि प्रशासनावरील वचक कसा असावा याचा परिचय करून दिला. संकट काळात राज्याच्या प्रमुखाने कसे वागावे, सर्वसमावेशक धोरणे कशी राबवावित याचे उदाहरण रेखाटले. मुंबईतील धारावी, वरळी या वस्त्यांमधील जनता ही कोरोनाच्या काळात किती शिस्तबद्ध नियोजनाने वावरत होती हे जगाने पाहिले आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जगभरात कौतुकही झाले होते. राज्यातील जनतेने याच काळात उद्धव ठाकरे यांना आपल्या परिवारात सामावून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत भाजपने केलेले राजकारण, त्यांचा पक्ष फोडण्याचे, पक्षाचे नाव - चिन्ह काढून घेण्याचे केलेले घृणास्पद कारस्थान महाराष्ट्रातल्या जनतेला रुचले नाही. 

तसेही भाजपच्या विरोधात मुंबई-महाराष्ट्रात वातावरण होतेच. ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत. त्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांचे  विश्लेषण आणि परीक्षण पक्षांतर्गत बैठकीत निश्चितपणे केले जाईल.  

     मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच होती आहे आणि राहणार यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.      ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत.     भाजपला या निकालांनी मात्र ‘गर्वाचे घर खाली’ या म्हणीचा अर्थ निश्चित कळला असावा.     मतदारांनी भाजपचे गर्वहरण करण्याचे ठरवले होतेच आणि तेच या निकालातून स्पष्ट झाले.     उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच महाराष्ट्रातील असली नेते आहेत हेच जनतेने या निकालांनी अधोरेखित केले हे स्पष्ट आहे.  

लढाऊ वृत्ती भावलीउद्धव ठाकरे यांच्याप्रति असणारी सहानुभूतीची लाट जाणवत होती. त्यात उद्धव यांची विनम्रता, सच्चाई आणि सर्वस्व हरपूनही जिद्दीने लढण्याची वृत्ती जनतेला भावली आणि म्हणूनच  उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने मनापासून पाठिंबा देत भाजपचा गर्वाचा वारू रोखण्यात उद्धव यांना साथ देत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना