शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

इंडिया आघाडी २५ टक्के जागांवर एकमेकांविरोधात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 06:32 IST

नांदेड, परभणीच्या सभेत विरोधकांवर टीका, इंडिया आघाडीकडे चेहराच नाही. त्यामुळे हा देश कुणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसत आहेत. 

शिवराज बिचेवार/ज्ञानेश्वर भालेनांदेड/परभणी : इंडिया आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीअगोदरच आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे काही जणांनी लोकसभेच्या रिंगणातून पळ काढत राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश केला आहे. देशातील जवळपास २५ टक्के जागांवर इंडिया आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तेच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करीत आहेत. ४ जूननंतर तर ते एकमेकांचे कपडे फाडतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या नांदेड, परभणी येथे शनिवारी सभा झाल्या. “सर्वांना माझा नमस्कार, २६ एप्रिलची तयारी झाली ना? असा सवाल करीत मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली.  यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीशमहाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. 

शंकररावांकडून शिकण्याचा प्रयत्नपंतप्रधान मोदी यांनी माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आठवण काढली. ते म्हणाले, मी राजकारणात नव्हतो, त्यावेळी पट्टपर्ती येथे सत्यसाईबाबा यांनी शंकरराव चव्हाण यांच्याशी माझी ओळख करून दिली. मला त्यांच्याशी बोलण्याचे सौभाग्य मिळाले. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या व्यक्तीतील नम्रता बघून मी प्रभावित झालो.

महादेव जानकर हे माझे लहान भाऊमतदाराला साद घालताना मोदी म्हणाले, तुमचे स्वप्न माझे संकल्प असून, परभणीसह मराठवाड्याचा विकास व्हावा, या उद्देशाने आगामी काळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. त्यात निश्चितच परभणीला न्याय मिळेल. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत, त्यांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे.

मराठवाड्याच्या विकासात काँग्रेसने घातला खोडापरभणी येथील सभेत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मराठवाड्याच्या विकासाच्या प्रक्रियेत काँग्रेसने सातत्याने खोडा घातल्यामुळेच मराठवाडा आजही मागासलेलाच राहिला. आम्ही मराठवाड्याला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी जलयुक्त शिवारसह वॉटर ग्रीडसारख्या काही महत्त्वपूर्ण योजना अमलात आणल्या होत्या; पण काँग्रेससह त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर पक्षांनी या योजना बंद करून मराठवाड्यावर एकप्रकारे अन्याय केला.

इंडिया आघाडीकडे चेहराच नाही. त्यामुळे हा देश कुणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसत आहेत.  काँग्रेसच्या साहिबजाद्यांना तर वायनाडमध्येही संकट दिसत आहे. त्यामुळे ते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. नुकतेच साहिबजाद्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सुनावले. त्यांना परंपरागत अमेठीतून बाहेर पडावे लागले, वायनाड सोडावे लागले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४parbhani-pcपरभणीnanded-pcनांदेड