शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आधी जे झालं ते विसरा, आपण एकत्र येऊ; उद्धव ठाकरेंची मुस्लीम समुदायाला साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 10:59 IST

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुस्लीम समुदायाला एकत्र येत साथ देण्याचं आवाहन केले आहे. 

मुंबई - Uddhav Thackeray on Muslim ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दादरच्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम समुदायातील लोकांसोबत संवाद साधला. यावेळी देशाचं संविधान वाचवण्यासाठी आधी जे झालं ते विसरा, आपल्याला एकत्र यायला हवं अशी साद उद्धव ठाकरेंनीमुस्लीम समाजाला घातली. माहिममधील मुस्लीम समुदायातील लोकांसोबत ठाकरेंनी बैठक घेतली.

या बैठकीनंतर बाहेर आलेल्या मुस्लीम समाजातील लोकांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंशी संवाद साधून चांगले वाटले. प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची भाषा त्यांनी केली. देशाचे संविधान वाचवण्याचं ते बोलले. कोणाविषयी त्यांनी वाईट म्हटलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आधी जे काही झालं ते विसरा, आज आपल्याला एकत्र यायला हवं. संविधानाला वाचवायचं आहे. यानंतर निवडणूक होईल की नाही अशी शंका उद्धव ठाकरेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं सांगितले. 

तसेच जे देशासाठी चांगले आहे, त्यांना आम्ही साथ देऊ. आमचं कुणाशी शत्रुत्व नाही. पुढील काळात देशासाठी जे चांगले होणार आहे त्यासाठी आम्ही साथ देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी चांगले काम केलेय. देशासाठी अनेकांनी बलिदान दिलंय म्हणून देशाला वाचवायचं आहे. उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. बटण कुणाचेही दाबा जिंकणार उद्धव ठाकरेच असंही या लोकांनी सांगितले. 

दरम्यान, आज आपल्या देशातील लोकांसमोर अनेक समस्या आहेत. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी सर्वात चांगले काम केले. ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते. तसेच एमआयएमच्या पतंगला धागा नाही. ती भाजपाची बी टीम आहे. द्वेषाशिवाय एमआयएम काम करत नाही. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात जनतेवर खूप उपकार केलेत. त्या उपकाराची परतफेड करण्याची ही वेळ आहे. आम्ही हे उपकार फेडू असंही याठिकाणी आलेले राहिद अन्सारी यांनी म्हटलं. 

मुस्लीम समाजातील सुन्नी, शिया सर्व घटकांशी संवाद साधला. देशाचं वातावरण खराब झालं आहे. मी घरातील चूल पेटवणारा आहे. महागाई, बेरोजगारी, विकास यावर बोलतोय. जुन्या गोष्टी विसरून येणाऱ्या काळात एकसाथ संविधानाला वाचवू  असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं लोकांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीचे आपले पुरोगामी विचारांचे उमेदवार आहेत अनिल देसाई यांना निवडून आणा असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं माहिमचे अकील अहमद शेख यांनी म्हटलं. 

गेल्या २५ वर्षापासून आमच्या परिसरात शिवसेनेचा आमदार निवडून येतो. आम्ही पुरोगामी लोक आहोत. भाजपा काळात लोकशाहीला धोका आहे. खासगीकरण वाढत आहे. कामगार कायदे हटवण्यात आले आहे. केवळ अंबानी अदानींसाठी काम सुरू आहे. उद्धव ठाकरे हे पुरोगामी आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची धोरणं वेगळी आहेत - रिझवान कुरेशी, लेबर युनियन, उपाध्यक्ष

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Muslimमुस्लीम