शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आधी जे झालं ते विसरा, आपण एकत्र येऊ; उद्धव ठाकरेंची मुस्लीम समुदायाला साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 10:59 IST

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुस्लीम समुदायाला एकत्र येत साथ देण्याचं आवाहन केले आहे. 

मुंबई - Uddhav Thackeray on Muslim ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दादरच्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम समुदायातील लोकांसोबत संवाद साधला. यावेळी देशाचं संविधान वाचवण्यासाठी आधी जे झालं ते विसरा, आपल्याला एकत्र यायला हवं अशी साद उद्धव ठाकरेंनीमुस्लीम समाजाला घातली. माहिममधील मुस्लीम समुदायातील लोकांसोबत ठाकरेंनी बैठक घेतली.

या बैठकीनंतर बाहेर आलेल्या मुस्लीम समाजातील लोकांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंशी संवाद साधून चांगले वाटले. प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची भाषा त्यांनी केली. देशाचे संविधान वाचवण्याचं ते बोलले. कोणाविषयी त्यांनी वाईट म्हटलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आधी जे काही झालं ते विसरा, आज आपल्याला एकत्र यायला हवं. संविधानाला वाचवायचं आहे. यानंतर निवडणूक होईल की नाही अशी शंका उद्धव ठाकरेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं सांगितले. 

तसेच जे देशासाठी चांगले आहे, त्यांना आम्ही साथ देऊ. आमचं कुणाशी शत्रुत्व नाही. पुढील काळात देशासाठी जे चांगले होणार आहे त्यासाठी आम्ही साथ देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी चांगले काम केलेय. देशासाठी अनेकांनी बलिदान दिलंय म्हणून देशाला वाचवायचं आहे. उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. बटण कुणाचेही दाबा जिंकणार उद्धव ठाकरेच असंही या लोकांनी सांगितले. 

दरम्यान, आज आपल्या देशातील लोकांसमोर अनेक समस्या आहेत. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी सर्वात चांगले काम केले. ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते. तसेच एमआयएमच्या पतंगला धागा नाही. ती भाजपाची बी टीम आहे. द्वेषाशिवाय एमआयएम काम करत नाही. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात जनतेवर खूप उपकार केलेत. त्या उपकाराची परतफेड करण्याची ही वेळ आहे. आम्ही हे उपकार फेडू असंही याठिकाणी आलेले राहिद अन्सारी यांनी म्हटलं. 

मुस्लीम समाजातील सुन्नी, शिया सर्व घटकांशी संवाद साधला. देशाचं वातावरण खराब झालं आहे. मी घरातील चूल पेटवणारा आहे. महागाई, बेरोजगारी, विकास यावर बोलतोय. जुन्या गोष्टी विसरून येणाऱ्या काळात एकसाथ संविधानाला वाचवू  असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं लोकांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीचे आपले पुरोगामी विचारांचे उमेदवार आहेत अनिल देसाई यांना निवडून आणा असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं माहिमचे अकील अहमद शेख यांनी म्हटलं. 

गेल्या २५ वर्षापासून आमच्या परिसरात शिवसेनेचा आमदार निवडून येतो. आम्ही पुरोगामी लोक आहोत. भाजपा काळात लोकशाहीला धोका आहे. खासगीकरण वाढत आहे. कामगार कायदे हटवण्यात आले आहे. केवळ अंबानी अदानींसाठी काम सुरू आहे. उद्धव ठाकरे हे पुरोगामी आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची धोरणं वेगळी आहेत - रिझवान कुरेशी, लेबर युनियन, उपाध्यक्ष

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Muslimमुस्लीम