शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'यामुळे' पवारांना वाटते गडकरी, राजनाथ सिंह यांच्या भवितव्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 14:25 IST

अनेक सर्व्हेमधून देशात त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत एनडीएला गडकरी एकसंध ठेवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर देशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास पंतप्रधान पदासाठी भाजप नेते नितीन गडकरी यांचे नाव समोर येते. त्याचवेळी पंतप्रधानपदासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाची देखील अधुनमधून चर्चा रंगत असते. मात्र या दोघांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यापासून आपल्याला त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते, असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले. एक मुलाखतीत शरद पवार बोलत होते.

अनेक सर्व्हेमधून देशात त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत एनडीएला गडकरी एकसंध ठेवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच गडकरी संघाच्या जवळचे असून ही त्यांच्यासाठी जमेची बाब ठरेल अस मत अनेकांचे आहे. त्यामुळे गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी समोर येत असते. मागील काही दिवसांत गडकरी देखील सरकारला घरचा आहेर देताना दिसले आहेत. दुसरीकडे राजनाथ सिंह भाजपचे ज्येष्ठ नेते असून पंतप्रधान म्हणून मोदी नसले तर राजनाथ असंही अनेकांना वाटते. यावर पवारांनी आपले मत स्पष्ट केले.

गडकरी आणि राजनाथ यांचे नाव समोर आल्यास त्यांची काळजी वाटते. गडकरी माझे चांगले मित्र आहे. राजनाथ सिंह देखील भला माणूस आहे. मात्र त्यांचे नाव आल्यास त्यांच्या भवितव्याबाबत चिंता वाटते. सध्या मोदी आणि अमित शाह यांच्याकडे भाजपची सुत्रे आहेत. ज्यावेळी गडकरी, राजनाथ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येईल, त्यावेळी भाजपचे सुत्रधार या दोघांसोबत काय करतील, हे आपण सांगू शकत नाही, अशी भितीही पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNitin Gadkariनितीन गडकरीRajnath Singhराजनाथ सिंह