शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

...जेंव्हा पंतप्रधान जाहीर सभेत खोटं बोलतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:16 IST

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मतदार यादीतून सहा वर्षांसाठी बाद करण्यात आले होते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात घातली होती. मात्र यात काँग्रेसचा हात होता, असं कुठंही दिसून आलं नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रमधुमाळी जोरात सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे सभा घेतली. या सभेत मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. परंतु, याचवेळी मोदींनी एक खोटा दावा केल्याचे समोर आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत मोदी म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काँग्रेसनेच काढला होता. वास्तविक पाहता, हा निर्णय न्यायालयाने दिला होता.

लातूरमधील शिवसैनिकांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी असा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मतदार यादीतून सहा वर्षांसाठी बाद करण्यात आले होते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात घातली होती. मात्र यात काँग्रेसचा हात होता, असं कुठंही दिसून आलं नाही.

३२ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मुंबईच्या विले-पार्ले विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली होती. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपने सोबत लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू यांनी काँग्रेसचे प्रभाकर कुटे यांना पराभूत केले होते. या पराभवाविरुद्ध कुटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच बाळासाहेब आणि शिवसेना उमेदवाराने धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायलयात बाळासाहेब आणि रमेश प्रभू दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू यांचा ६ वर्षांसाठी मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार काढून घेण्यात आदेश दिले होते. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायलयाने देखील हा निर्णय कायम ठेवला होता.

दरम्यान तत्कालीन राष्ट्रपतींनी जुलै १९९९ मध्ये न्यायालयाचा आदेश लागू केला. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव मतदार यादीतून काढण्यात आले होते. तसेच १९९५ ते २००१ या कालावधीसाठी त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या वेळी केंद्रात भाजपचे सरकार होते. मात्र या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची काहीही भूमिका नव्हती हे स्पष्टच आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत काँग्रेसवर हा खोटा आरोप का लावला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीlaturलातूरcongressकाँग्रेस