शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

...जेंव्हा पंतप्रधान जाहीर सभेत खोटं बोलतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:16 IST

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मतदार यादीतून सहा वर्षांसाठी बाद करण्यात आले होते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात घातली होती. मात्र यात काँग्रेसचा हात होता, असं कुठंही दिसून आलं नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रमधुमाळी जोरात सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे सभा घेतली. या सभेत मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. परंतु, याचवेळी मोदींनी एक खोटा दावा केल्याचे समोर आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत मोदी म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काँग्रेसनेच काढला होता. वास्तविक पाहता, हा निर्णय न्यायालयाने दिला होता.

लातूरमधील शिवसैनिकांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी असा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मतदार यादीतून सहा वर्षांसाठी बाद करण्यात आले होते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात घातली होती. मात्र यात काँग्रेसचा हात होता, असं कुठंही दिसून आलं नाही.

३२ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मुंबईच्या विले-पार्ले विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली होती. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपने सोबत लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू यांनी काँग्रेसचे प्रभाकर कुटे यांना पराभूत केले होते. या पराभवाविरुद्ध कुटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच बाळासाहेब आणि शिवसेना उमेदवाराने धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायलयात बाळासाहेब आणि रमेश प्रभू दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू यांचा ६ वर्षांसाठी मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार काढून घेण्यात आदेश दिले होते. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायलयाने देखील हा निर्णय कायम ठेवला होता.

दरम्यान तत्कालीन राष्ट्रपतींनी जुलै १९९९ मध्ये न्यायालयाचा आदेश लागू केला. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव मतदार यादीतून काढण्यात आले होते. तसेच १९९५ ते २००१ या कालावधीसाठी त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या वेळी केंद्रात भाजपचे सरकार होते. मात्र या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची काहीही भूमिका नव्हती हे स्पष्टच आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत काँग्रेसवर हा खोटा आरोप का लावला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीlaturलातूरcongressकाँग्रेस