शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

...जेंव्हा पंतप्रधान जाहीर सभेत खोटं बोलतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:16 IST

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मतदार यादीतून सहा वर्षांसाठी बाद करण्यात आले होते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात घातली होती. मात्र यात काँग्रेसचा हात होता, असं कुठंही दिसून आलं नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रमधुमाळी जोरात सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे सभा घेतली. या सभेत मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. परंतु, याचवेळी मोदींनी एक खोटा दावा केल्याचे समोर आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत मोदी म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काँग्रेसनेच काढला होता. वास्तविक पाहता, हा निर्णय न्यायालयाने दिला होता.

लातूरमधील शिवसैनिकांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी असा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मतदार यादीतून सहा वर्षांसाठी बाद करण्यात आले होते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात घातली होती. मात्र यात काँग्रेसचा हात होता, असं कुठंही दिसून आलं नाही.

३२ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मुंबईच्या विले-पार्ले विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली होती. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपने सोबत लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू यांनी काँग्रेसचे प्रभाकर कुटे यांना पराभूत केले होते. या पराभवाविरुद्ध कुटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच बाळासाहेब आणि शिवसेना उमेदवाराने धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायलयात बाळासाहेब आणि रमेश प्रभू दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू यांचा ६ वर्षांसाठी मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार काढून घेण्यात आदेश दिले होते. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायलयाने देखील हा निर्णय कायम ठेवला होता.

दरम्यान तत्कालीन राष्ट्रपतींनी जुलै १९९९ मध्ये न्यायालयाचा आदेश लागू केला. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव मतदार यादीतून काढण्यात आले होते. तसेच १९९५ ते २००१ या कालावधीसाठी त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या वेळी केंद्रात भाजपचे सरकार होते. मात्र या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची काहीही भूमिका नव्हती हे स्पष्टच आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत काँग्रेसवर हा खोटा आरोप का लावला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीlaturलातूरcongressकाँग्रेस