शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गुजरातेत उद्धव ठाकरेंना भगवा आठवला; पण राममंदिराचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 17:28 IST

शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा लावून धरला होता. 'पहिले मंदिर फिर सरकार'ची घोषणा करत त्यांनी भाजपवर चहुबाजुने टीका केली होती. मात्र गुजरातमध्ये  अमित शाह यांचा दाखल करण्यासाठी जाऊन राममंदिराच्या मुद्दावर उद्धव यांनी आपली तलावार म्याने केल्याचे चित्र आहे.

मुंबई - सेना-भाजपची विचारधारा समान असल्याने आम्ही एकत्र आलो. मागील २५ वर्षांपासून भगवा घेऊन आम्ही एकत्र राहिलो. युतीची ही २५ वर्षे कशी गेली कळलेच नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. यावेळी आपल्या भाषणात उद्धव यांनी राम मंदिराबद्दल चकार शब्द उचारला नाही.

शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा लावून धरला होता. 'पहिले मंदिर फिर सरकार'ची घोषणा करत त्यांनी भाजपवर चहुबाजुने टीका केली होती. मात्र गुजरातमध्ये  अमित शाह यांचा दाखल करण्यासाठी जाऊन राममंदिराच्या मुद्दावर उद्धव यांनी आपली तलावार म्याने केल्याचे चित्र आहे.

अयोध्या दौऱ्यात राम मंदिरच्या मुद्दावर चार वर्षांपासून झोपलेल्या कुंभकरणाला जाग करण्यासाठी आयोध्येत दाखल झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. भाजप सरकार स्थापन होईल किंवा नाही पण राम मंदिर व्हायलाच हवं अशी मागणी सुद्धा त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र हे सगळं केवळ ढोंग होत का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

गांधीनगर येथील भाषणात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व,भगवा याबद्दल बोलताना सेना-भाजप विचारधारा एकसारखी असल्याचे सांगितले. मात्र आपल्या पूर्ण भाषणात त्यांनी राम मंदिराबद्दल कुठेच उल्लेख केला नाही. त्यामुळे युती होण्याच्या आधी राम मंदिरावर बोलणारे उद्धव यांना निवडणुकीत मात्र विसर पडल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना