शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

२००९ चा करिष्मा पुन्हा करण्यासाठी राज ठाकरेंची माघार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:45 IST

लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.

मुंबई - राजकीय पटलावर धुमधडाक्यात एंट्री करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदारांसह महाराष्ट्रभर दरारा निर्माण करणाऱ्या मनसेकडे आज एकही आमदार शिल्लक नाही. गेल्या काही वर्षांतील अनेक घडामोडींचा मनसेला फटका बसला आहे. परंतु आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेत लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकत व्यर्थ न घालवता विधानसभा निवडणुकीत २००९ प्रमाणे करिष्मा करण्याची तयारी राज ठाकरे यांनी केल्याची भावना सध्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राज ठाकरे यांनी २००९ मध्ये मनसेची स्थापना केली होती. पहिल्याच प्रयत्नात राज यांनी १३ आमदार निवडून आणले होते. ही कामगिरी मनसेचा आत्मविश्वास वाढविणारी होती. त्यापाठोपाठ नाशिक महानगर पालिका एकहाती मिळविण्याची किमया मनसेने केले होती. परंतु त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली. त्यातून आतापर्यंत पक्ष सावरलेला नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत राज ठाकरे यांनी शिवसेनेविरुद्ध उमेदवार दिले होते. यामध्ये मनसेचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मनसेची अनामत रक्कम जप्त झाली होती. या नामुष्कीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मनसेची धुळधान झाली. १०० हून अनेक जागा लढविणाऱ्या मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता. तो देखील आज शिवसेनेते गेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसेची ताकत कमी पडणार हे निश्चितच आहे. तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्च होणार आहे. हा खर्च केल्यानंतर काही महिन्यातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकाच्या तयारीसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे