शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

२००९ चा करिष्मा पुन्हा करण्यासाठी राज ठाकरेंची माघार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:45 IST

लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.

मुंबई - राजकीय पटलावर धुमधडाक्यात एंट्री करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदारांसह महाराष्ट्रभर दरारा निर्माण करणाऱ्या मनसेकडे आज एकही आमदार शिल्लक नाही. गेल्या काही वर्षांतील अनेक घडामोडींचा मनसेला फटका बसला आहे. परंतु आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेत लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकत व्यर्थ न घालवता विधानसभा निवडणुकीत २००९ प्रमाणे करिष्मा करण्याची तयारी राज ठाकरे यांनी केल्याची भावना सध्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राज ठाकरे यांनी २००९ मध्ये मनसेची स्थापना केली होती. पहिल्याच प्रयत्नात राज यांनी १३ आमदार निवडून आणले होते. ही कामगिरी मनसेचा आत्मविश्वास वाढविणारी होती. त्यापाठोपाठ नाशिक महानगर पालिका एकहाती मिळविण्याची किमया मनसेने केले होती. परंतु त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली. त्यातून आतापर्यंत पक्ष सावरलेला नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत राज ठाकरे यांनी शिवसेनेविरुद्ध उमेदवार दिले होते. यामध्ये मनसेचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मनसेची अनामत रक्कम जप्त झाली होती. या नामुष्कीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मनसेची धुळधान झाली. १०० हून अनेक जागा लढविणाऱ्या मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता. तो देखील आज शिवसेनेते गेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसेची ताकत कमी पडणार हे निश्चितच आहे. तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्च होणार आहे. हा खर्च केल्यानंतर काही महिन्यातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकाच्या तयारीसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे