शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 15:02 IST

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती.

मुंबई - प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या प्रवक्ते पदासह सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. याआधी त्यांनी पक्षातून कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस सोडण्यामागे वेगळच काऱण असल्याचे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संबंधीत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, दिलगीरी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.

यावर प्रियंका यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय ट्विटरवरून स्पष्ट केला होता. परंतु, प्रियंका यांनी काँग्रेस सोडण्यामागे आणखी कारण असल्याचे समजते. प्रियंका यांनी राफेलच्या कथीत घोटाळ्यावरून मुथेरत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावरून प्रियंका मथुरेतून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. परंतु, काँग्रेसकडून मथुरेत आधीच महेश पाठक यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर प्रियंका मुंबईतून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र इथे देखील काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि प्रिया दत्त यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. तर मुंबईतून तीन महिला उमेदवार उतरविणे शक्य नव्हते.

दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे मथुरेच्या उमेदवारीचे कारण तत्कालीक असले तरी यामागे राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना