शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 15:02 IST

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती.

मुंबई - प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या प्रवक्ते पदासह सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. याआधी त्यांनी पक्षातून कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस सोडण्यामागे वेगळच काऱण असल्याचे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संबंधीत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, दिलगीरी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.

यावर प्रियंका यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय ट्विटरवरून स्पष्ट केला होता. परंतु, प्रियंका यांनी काँग्रेस सोडण्यामागे आणखी कारण असल्याचे समजते. प्रियंका यांनी राफेलच्या कथीत घोटाळ्यावरून मुथेरत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावरून प्रियंका मथुरेतून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. परंतु, काँग्रेसकडून मथुरेत आधीच महेश पाठक यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर प्रियंका मुंबईतून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र इथे देखील काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि प्रिया दत्त यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. तर मुंबईतून तीन महिला उमेदवार उतरविणे शक्य नव्हते.

दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे मथुरेच्या उमेदवारीचे कारण तत्कालीक असले तरी यामागे राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना