शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 15:02 IST

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती.

मुंबई - प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या प्रवक्ते पदासह सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. याआधी त्यांनी पक्षातून कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस सोडण्यामागे वेगळच काऱण असल्याचे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संबंधीत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, दिलगीरी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.

यावर प्रियंका यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय ट्विटरवरून स्पष्ट केला होता. परंतु, प्रियंका यांनी काँग्रेस सोडण्यामागे आणखी कारण असल्याचे समजते. प्रियंका यांनी राफेलच्या कथीत घोटाळ्यावरून मुथेरत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावरून प्रियंका मथुरेतून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. परंतु, काँग्रेसकडून मथुरेत आधीच महेश पाठक यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर प्रियंका मुंबईतून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र इथे देखील काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि प्रिया दत्त यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. तर मुंबईतून तीन महिला उमेदवार उतरविणे शक्य नव्हते.

दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे मथुरेच्या उमेदवारीचे कारण तत्कालीक असले तरी यामागे राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना