शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

'त्या' अकरा गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार कायम; प्रशासनही हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:06 IST

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या गावातील नागरिकांची शुक्रवारी तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत सर्वांनी मतदान करण्याची विनंती केली. परंतु, गावकऱ्यांनी प्रशासनाची विनंती धुडकावली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई - पैठण तालुक्यातील ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनामुळे राजकीय पुढाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. योजना रखलड्यामुळे येथील ११ गावातील गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गावकऱ्यांच्या आक्रमक भूमीकेमुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण तालुक्यातील ११ गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात तहसीलदारांना निवदेन देखील देण्यात आले आहे. त्यानंतर मतदानावरील बहिष्कार गावकऱ्यांनी मागे घ्यावा यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले. मात्र गावकरी आपल्या निर्णयावर ठाम आहे. निवडणुका जवळ येताच ही योजना पूर्ण केली जाईल असे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागल्याने २३ वर्षांपासून काम रखडलेले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार चांगलेच धास्तावले आहे. 

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या गावातील नागरिकांची शुक्रवारी तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत सर्वांनी मतदान करण्याची विनंती केली. परंतु, गावकऱ्यांनी प्रशासनाची विनंती धुडकावली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा रावसाहेब दानवे हे खासदार राहिले आहेत. यावेळी मात्र गावकऱ्यांच्या मतदानावरील बहिष्काराच्या भुमिकेमुळे त्यांची चिंता वाढली आहे. मतदानावरील बहिष्कार कसा मागे घेता येईल यासाठी रावसाहेब दानवे प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र गावकरी जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर दानवेंच्या अडचणी वाढू शकतात. 

मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या ११ गावातील गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे. त्यातील काही गावकऱ्यांनी मतदान करण्याचे आश्वासन दिले आहे. उरलेल्या गावकऱ्यांचे ही मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आहे. मतदान सर्वांनी करून आपला हक्क बजावला पाहिजे.- महेश सावंत ( तहसीलदार पैठण )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raosaheb danveरावसाहेब दानवेdroughtदुष्काळlok sabhaलोकसभा