शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'त्या' अकरा गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार कायम; प्रशासनही हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:06 IST

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या गावातील नागरिकांची शुक्रवारी तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत सर्वांनी मतदान करण्याची विनंती केली. परंतु, गावकऱ्यांनी प्रशासनाची विनंती धुडकावली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई - पैठण तालुक्यातील ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनामुळे राजकीय पुढाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. योजना रखलड्यामुळे येथील ११ गावातील गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गावकऱ्यांच्या आक्रमक भूमीकेमुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण तालुक्यातील ११ गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात तहसीलदारांना निवदेन देखील देण्यात आले आहे. त्यानंतर मतदानावरील बहिष्कार गावकऱ्यांनी मागे घ्यावा यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले. मात्र गावकरी आपल्या निर्णयावर ठाम आहे. निवडणुका जवळ येताच ही योजना पूर्ण केली जाईल असे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागल्याने २३ वर्षांपासून काम रखडलेले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार चांगलेच धास्तावले आहे. 

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या गावातील नागरिकांची शुक्रवारी तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत सर्वांनी मतदान करण्याची विनंती केली. परंतु, गावकऱ्यांनी प्रशासनाची विनंती धुडकावली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा रावसाहेब दानवे हे खासदार राहिले आहेत. यावेळी मात्र गावकऱ्यांच्या मतदानावरील बहिष्काराच्या भुमिकेमुळे त्यांची चिंता वाढली आहे. मतदानावरील बहिष्कार कसा मागे घेता येईल यासाठी रावसाहेब दानवे प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र गावकरी जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर दानवेंच्या अडचणी वाढू शकतात. 

मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या ११ गावातील गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे. त्यातील काही गावकऱ्यांनी मतदान करण्याचे आश्वासन दिले आहे. उरलेल्या गावकऱ्यांचे ही मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आहे. मतदान सर्वांनी करून आपला हक्क बजावला पाहिजे.- महेश सावंत ( तहसीलदार पैठण )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raosaheb danveरावसाहेब दानवेdroughtदुष्काळlok sabhaलोकसभा