शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

नेत्यांनो खबरदार ! प्रचारासाठी आल्यास चोप मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 17:14 IST

पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाचे नेते आणि उमेदवार खेड्या-पाड्यात जाऊन आपला प्रचार करत आहे. पाच वर्षांत कधीही न पाहिलेले गावात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हर्षी गावात मात्र कोणताही राजकीय नेता जायला तयार नाही, यांचं कारण ही तसच आहे. नेतेमंडळी आले तर चोप दिला जाईल, या गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे राजकीय पुढारी गावात प्रचार करण्यासाठी इच्छूक नाही. 

पैठण तालुक्यातील हर्षी म्हणून असलेल्या गावात आणि गावच्या शिवारात गावकऱ्यांनी होर्डिग लावली आहे. गावात राजकीय नेत्यांना बंदी आहे. गावात जर कुणी मतदान मागायला आले तर चोप दिला जाईल अशा प्रकारचा संदेश होर्डिंगमधून देण्यात आला आहे.  

पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते. पंचायत समिती निवडणुका असो की लोकसभा प्रत्येक वेळी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागलेले आहे.   

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी गावभेठी घेत असून मतदान करण्याचे अवाहन करत आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील हर्षी या गावातील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेते आणि कार्यकर्ते यांनी धसका घेतला असून गावच्या आसपासच्या परिसरात कोणत्याच पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराला फिरकत नसल्याने हे गाव चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९droughtदुष्काळFarmerशेतकरी