शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नेत्यांनो खबरदार ! प्रचारासाठी आल्यास चोप मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 17:14 IST

पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाचे नेते आणि उमेदवार खेड्या-पाड्यात जाऊन आपला प्रचार करत आहे. पाच वर्षांत कधीही न पाहिलेले गावात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हर्षी गावात मात्र कोणताही राजकीय नेता जायला तयार नाही, यांचं कारण ही तसच आहे. नेतेमंडळी आले तर चोप दिला जाईल, या गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे राजकीय पुढारी गावात प्रचार करण्यासाठी इच्छूक नाही. 

पैठण तालुक्यातील हर्षी म्हणून असलेल्या गावात आणि गावच्या शिवारात गावकऱ्यांनी होर्डिग लावली आहे. गावात राजकीय नेत्यांना बंदी आहे. गावात जर कुणी मतदान मागायला आले तर चोप दिला जाईल अशा प्रकारचा संदेश होर्डिंगमधून देण्यात आला आहे.  

पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते. पंचायत समिती निवडणुका असो की लोकसभा प्रत्येक वेळी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागलेले आहे.   

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी गावभेठी घेत असून मतदान करण्याचे अवाहन करत आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील हर्षी या गावातील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेते आणि कार्यकर्ते यांनी धसका घेतला असून गावच्या आसपासच्या परिसरात कोणत्याच पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराला फिरकत नसल्याने हे गाव चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९droughtदुष्काळFarmerशेतकरी