शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नेत्यांनो खबरदार ! प्रचारासाठी आल्यास चोप मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 17:14 IST

पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाचे नेते आणि उमेदवार खेड्या-पाड्यात जाऊन आपला प्रचार करत आहे. पाच वर्षांत कधीही न पाहिलेले गावात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हर्षी गावात मात्र कोणताही राजकीय नेता जायला तयार नाही, यांचं कारण ही तसच आहे. नेतेमंडळी आले तर चोप दिला जाईल, या गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे राजकीय पुढारी गावात प्रचार करण्यासाठी इच्छूक नाही. 

पैठण तालुक्यातील हर्षी म्हणून असलेल्या गावात आणि गावच्या शिवारात गावकऱ्यांनी होर्डिग लावली आहे. गावात राजकीय नेत्यांना बंदी आहे. गावात जर कुणी मतदान मागायला आले तर चोप दिला जाईल अशा प्रकारचा संदेश होर्डिंगमधून देण्यात आला आहे.  

पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते. पंचायत समिती निवडणुका असो की लोकसभा प्रत्येक वेळी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागलेले आहे.   

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी गावभेठी घेत असून मतदान करण्याचे अवाहन करत आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील हर्षी या गावातील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेते आणि कार्यकर्ते यांनी धसका घेतला असून गावच्या आसपासच्या परिसरात कोणत्याच पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराला फिरकत नसल्याने हे गाव चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९droughtदुष्काळFarmerशेतकरी