शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

'गर्व से कहो हम निजाम है' म्हणणाऱ्यांचा औरंगाबादमध्ये विजय : नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 10:53 AM

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार औरंगाबाद मतदार संघातून विजयी झाला आहे. शिवसेनच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना वंचित बहुजन आघाडीचा समाचार घेतला आहे. औरंगाबादचा निकाल म्हणजे 'हम निजाम है' म्हणणाऱ्यांचा विजय आहे. वंचित आघाडीचा सर्वाधिक फायदा फक्त एमआयएमला झाला असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीबाबत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. प्रकाश आंबेडकर यांचा सुद्धा पराभव झाला. एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना वंचित आघाडीचे सांगण्यात येत असले तरी ते एमआयएम पक्षाकडून उमेदवार होते. त्यामुळे, त्यांना वंचित बहुजन आघाडीचे खासदार म्हणता येणार नाही. औरंगाबादमध्ये 'गर्व से कहो हम निजाम है' म्हणणाऱ्यांचा विजय झाला आहे. मराठवाड्यात रजाकारांच्या विरोधात मुक्तिसंग्रामात अनेक पिढ्या उतरल्या होत्या, या पिढ्यांना लोकशाहीच्या मार्गाने नेस्तनाभूत करण्याचा काम औरंगाबादच्या जनतेकडून घडवून आणले गेले आहे. अशी खोचक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४८ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यात, औरंगाबादमध्ये एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना रिंगणात उतरवले होते. सलग चार वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनचे नेते चंद्रकात खैरे यांचा जलील यांनी पराभव केला आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Neelam gorheनीलम गो-हेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलील