शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

'दिल्लीचं विमानाचं तिकीट २० हजारांत अन् भाजपचं १०० कोटीला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:57 IST

२०१४ मध्ये 'अच्छे दिन आने वाले है' म्हटले होते. त्यानंतर आता 'सबका साथ सबका विकास', असं सांगितलं जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी 'न्यू इंडिया'ची घोषणा केली. २०१७ मध्ये 'मेरा देश बदल रहा है', २०१८ मध्ये 'साफ नियत सही विकास', २०१९ मध्ये 'मै भी चौकीदार'ची घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु, लोक चौकीदार चोर असल्याचे सांगतात, असंही अमित देशमुख यांनी सांगितले.

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी १०० कोटी रुपये मोजावे लागत असल्याचा घणाघाती आरोपी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील अहमदपूर येथे काँग्रेसेचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारासाठी आयोजित काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते.

सध्या पेपरमध्ये जाहिरातींचा भडीमार आहे. मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण सुरू आहे. देशाच्या इतिहासात भाजपने दाखवून दिलं की, सत्ता पक्ष काय-काय चुकीचं करू शकतो. लातूरहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट ५ हजार रुपये आहे. लातूरहून दिल्लीला विमानाने जाण्याचं तिकीट २० हजार रुपये आहे. पण लातूरहून दिल्लीला जाण्याचं भाजपचं लोकसभेचं तिकीट १०० कोटी रुपयांना मिळत असल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. तसेच यांची चौकशी होणे गरजेचे आहे. ही लोकशाहीची आणि मतदारांची चेष्टा असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी अमित देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका करताना म्हटले की, २०१४ मध्ये 'अच्छे दिन आने वाले है' म्हटले होते. त्यानंतर आता 'सबका साथ सबका विकास', असं सांगितलं जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी 'न्यू इंडिया'ची घोषणा केली. २०१७ मध्ये 'मेरा देश बदल रहा है', २०१८ मध्ये 'साफ नियत सही विकास', २०१९ मध्ये 'मै भी चौकीदार'ची घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु, लोक चौकीदार चोर असल्याचे सांगतात, असंही अमित देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, युवकांच्या हाताला काम हवं आहे. परंतु, यांनी 'मै भी चौकीदार'ची घोषणा सुरू केली. ज्यांनी पारदर्शकतेच्या गप्पा हाणल्या अशा भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला यावेळी आमित देशमुख यांनी दिली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपाlaturलातूर