शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'दिल्लीचं विमानाचं तिकीट २० हजारांत अन् भाजपचं १०० कोटीला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:57 IST

२०१४ मध्ये 'अच्छे दिन आने वाले है' म्हटले होते. त्यानंतर आता 'सबका साथ सबका विकास', असं सांगितलं जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी 'न्यू इंडिया'ची घोषणा केली. २०१७ मध्ये 'मेरा देश बदल रहा है', २०१८ मध्ये 'साफ नियत सही विकास', २०१९ मध्ये 'मै भी चौकीदार'ची घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु, लोक चौकीदार चोर असल्याचे सांगतात, असंही अमित देशमुख यांनी सांगितले.

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी १०० कोटी रुपये मोजावे लागत असल्याचा घणाघाती आरोपी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील अहमदपूर येथे काँग्रेसेचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारासाठी आयोजित काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते.

सध्या पेपरमध्ये जाहिरातींचा भडीमार आहे. मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण सुरू आहे. देशाच्या इतिहासात भाजपने दाखवून दिलं की, सत्ता पक्ष काय-काय चुकीचं करू शकतो. लातूरहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट ५ हजार रुपये आहे. लातूरहून दिल्लीला विमानाने जाण्याचं तिकीट २० हजार रुपये आहे. पण लातूरहून दिल्लीला जाण्याचं भाजपचं लोकसभेचं तिकीट १०० कोटी रुपयांना मिळत असल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. तसेच यांची चौकशी होणे गरजेचे आहे. ही लोकशाहीची आणि मतदारांची चेष्टा असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी अमित देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका करताना म्हटले की, २०१४ मध्ये 'अच्छे दिन आने वाले है' म्हटले होते. त्यानंतर आता 'सबका साथ सबका विकास', असं सांगितलं जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी 'न्यू इंडिया'ची घोषणा केली. २०१७ मध्ये 'मेरा देश बदल रहा है', २०१८ मध्ये 'साफ नियत सही विकास', २०१९ मध्ये 'मै भी चौकीदार'ची घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु, लोक चौकीदार चोर असल्याचे सांगतात, असंही अमित देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, युवकांच्या हाताला काम हवं आहे. परंतु, यांनी 'मै भी चौकीदार'ची घोषणा सुरू केली. ज्यांनी पारदर्शकतेच्या गप्पा हाणल्या अशा भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला यावेळी आमित देशमुख यांनी दिली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपाlaturलातूर