शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

भाजपकडून काँग्रेसला 'ही' गोष्ट शिकण्याची नितांत गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 15:22 IST

काँग्रेसचा जनाधार अद्याप सुरक्षीत दिसतोय. हीच काँग्रेसला पुनरागमानाची संधी आहे. त्यासाठी अडचणींवर तोडगा काढण्यापेक्षा पर्याय उभा करणे हा एकच मार्ग काँग्रेससमोर उरला आहे.

रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवताना सत्तास्थापनेचा दावा केला. त्याचवेळी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची पुरती वाताहत झाल्याचे चित्र आहे. दहा वर्षे सत्ताधारी असलेला काँग्रेसपक्ष सलग दहा वर्षांसाठी केंद्रातील सत्तेतून हद्दपार झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला. त्याचवेळी त्यांनी पक्षाच्या दुखत्या नाडीवर हात ठेवला. राहुल यांनी जो मुद्दा उपस्थित केला, त्यावर काँग्रेसला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

लोकसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी अद्याप फारशी घसरली नाही. आजही देशातील विविध जाती-धर्मातील लोकांचा काँग्रेसवर विश्वास आहे. किंबहुना काँग्रेसला मानणारा एक गटही आहे. काँग्रेसला मध्य प्रदेशात ३४ टक्के मते मिळाली. तर छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, तेलंगना, कर्नाटक आणि केरळमध्ये काँग्रेसला ३० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. यावरून काँग्रेसचा जनाधार अद्याप सुरक्षीत दिसतोय. हीच काँग्रेसला पुनरागमानाची संधी आहे. त्यासाठी अडचणींवर तोडगा काढण्यापेक्षा पर्याय उभा करणे हा एकच मार्ग काँग्रेससमोर उरला आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना सनसनीत इशारा दिला. कमलनाथ, अशोक गेहलोत, पी. चिंदबरम यांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलांच्या विजयावर सर्वाधिक लक्ष दिले. त्यामुळे पक्षाच्या कामगिरीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. तर भाजपमध्ये अशी मानसिकता दिसून येत नाही. किंबहुना तिकीट डावलेला विद्यमान खासदार देखील पक्षाचे काम उमेदवाराप्रमाणे करताना दिसून आला. महाराष्ट्रात किरीट सोमय्या, दिलीप गांधी यांची उदाहरणे आहेतच. परंतु, काँग्रेसमध्ये या उलट आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला तिकीट मिळाले की, काँग्रेस नेते त्याच्यासाठी जीवाचे रान करतात. मात्र पक्षाचे आपण नेते आहोत, हे ते विसरून जातात. अगदी हाच मुद्दा काँग्रेससाठी त्रासदायक ठरला आहे. याबाबतीत काँग्रेसने भाजपचे अनुकरण करणे नितांत गरजेचे आहे.

जुन्याच ट्रीकवर काँग्रेसचा भर

२०१४ लोकसभा निवडणुकीपासून भाजपची वाटचाल पाहिल्यास, सत्ताधाऱ्यांची प्रगती थक्क करणारी आहे. भाजपने बुथ पातळीपर्यंत तयार केलेले नेटवर्क त्यांच्यासाठी फायदेशीर आहेच, परंतु, त्या पलिकडे जाऊन भाजपने पक्षासमोर निर्माण झालेल्या समस्यांना पर्याय उभे करण्याचा मार्ग निवडला. मग ते मराठा मोर्चा असो वा, शेतकरी संप. मराठा मोर्चे फॉर्मात आले त्याचवेळी सर्वच समाज रस्त्यावर उतरले. हा पर्याय एकप्रकारे सत्ताधारी भाजपनेच दिला अशा अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र काँग्रेसमध्ये नवीन प्रयोग, आघाड्या किंवा निर्णायक चर्चा होताना दिसल्या नाहीत. केवळ आघाडीसाठी चर्चा आणि चर्चा फिसकटली तर प्लॅन बी नसणे हे देखील काँग्रेसला नुकसान करणारे ठरले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार चौकसपणाने राजकारण करताना दिसतात. राज ठाकरेंच्या सभा त्यातच एक भाग म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.

'वंचित'च्या आव्हानाला पर्याय हवाय

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवल्या. याचा फटका सर्वाधिक प्रमाणात आघाडीच्या उमेदावारांना बसला. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. अर्थात याचा फटका केवळ आघाडीलाच नव्हे तर काही प्रमाणात भाजपला देखील बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत २२ जागा मागून प्रकाश आंबेडकरांनी आघाडीवर पूर्णविराम दिला होता. विधानसभेला देखील आंबेडकरांनी तशीच भूमिका घेतल्यास, आघाडीला अवघड जाणार आहे. त्यामुळे वंचितच्या संभाव्य आव्हानासाठी आतापासूनच रणनिती आखण्याचा एकमेव पर्याय काँग्रेससमोर आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी