शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

Lok sabha Election 2019 : शिवसेनेच्या हिंगोलीसाठी भाजपची 'फिल्डींग' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 11:50 IST

शिवसेना आपला गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला देणार का, दिल्यास त्या बदल्यात काय घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. 

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सध्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर पेच निर्माण होताना दिसत आहे. जालना मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गळ घातलेली आहे. तर हिंगोली मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने 'फिल्डींग' लावण्यास सुरुवात केली आहे. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभाग उभय पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये शिवसेनेला हिंगोलीत केवळ 1632 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यांतरच्या घडामोडीवरून युती होणार नाही, असा अंदाज बांधून शिवाजी माने, ऍड. शिवाजी जाधव आणि शिवसेनेचे 2014 लोकसभा निवडणुकीचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापैकी ऍड. जाधव यांना भाजपकडून उमेदवारीचे गाजर दाखविण्यात आले होते. परंतु, अखेरच्या टप्प्यात शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे ऍड. जाधव यांच्यासह शिवाजी माने आणि सुभाष वानखेडे यांची गोची झाली आहे. 

शिवसेनेकडून हिंगोली मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आणि आमदार हेमंत पाटील यांच्यात चढाओढ आहे. येथील उमेदवारीसाठी शिवसेनेत खलबते सुरू आहे. दुसरीकडे इतर पक्षांना हाताशी धरून भाजपचे पधाधिकारी हिंगोली मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी भाजपकडून धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. यात भाजपला यश आल्यास शिवसेनेचा गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला मिळेल. परंतु त्या बदल्यात काय, असा पेच भाजपसमोर निर्माण होणार आहे.

भाजपवासी झालेले ऍड. शिवाजी जाधव, शिवाजी माने आणि सुभाष वानखेडे यांनी देखील इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार संघच भाजपच्या झोळीत पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे असलेली ही जागा मिळविण्यासाठी भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सर्वेक्षणात भाजपसाठी अनुकूल स्थिती ?

हिंगोली मतदार संघात गेल्यावेळी शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांचा थोडक्यात पराभव झाला होता. मोदी लाट असताना काँग्रेसला हा मतदार संघ जिंकण्यात यश आले होते. यंदा मोदी लाट ओसरली असली तरी सर्वेक्षणात हिंगोली मतदार संघात भाजपसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप ही जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार हे स्पष्टच आहे. मात्र शिवसेना आपला गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला देणार का, दिल्यास त्या बदल्यात काय घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाHingoliहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHemant Patilहेमंत पाटील