शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

Exclusive : 'आदर्श गाव' पाटोद्याचाही मतदानावर बहिष्कार; प्रशासनात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 18:01 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद-जालना मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १४ निवेदने प्राप्त झाली आहे. २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मोसीन शेख 

मुंबई -  आर्दश गाव म्हणून प्रथम पुरस्कार मिळालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पाटोदा गावच्या या भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. पाटोदा गावातील गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र गावातील गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते.   

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद-जालना मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १४ निवेदने प्राप्त झाली आहे. २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी गायरान जमीन प्रशासन देण्यास टाळत असल्याच्या आरोप पाटोदा येथील गावकऱ्यांनी केला आहे. 

राज्यातच नव्हेतर देशभरात अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाटोदा पॅटर्न राबवला जातो. राज्यात आदर्श ठरलेल्या पाटोदा सारख्या गावाने मतदानावर बहिष्कार घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल शासनाच्या तब्बल ५३ लाख रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले निर्मल ग्राम आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गाव राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी विकासाचे मॉडेल म्हणून समोर आले आहे.

याविषयी पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे यांना विचारले असता, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी गावातील ३ एकर गायरान जमिनी मिळावी म्हणून आम्ही २०१४ पासून मागणी करत आहे. जमिनीच्या मोजणीसाठी आम्ही पैसे सुद्धा भरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा मोजणी करून ताबा देण्याची मागणी केली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सर्व गावकऱ्यांनी ठराव घेत लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे पेरे यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद