शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: गड्या आपला गाव बरा...अडकलेले मजूर लागले परतू: नाशिकहून दोन गाड्या रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:49 IST

मुंबईतून गाड्या सोडण्याबाबत अजून अनिश्चितता

नवी दिल्ली/नाशिक : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाउननंतर तब्बल ४२ दिवसांनी रेल्वेने प्रवासी वाहतूक सुरू केली असून, त्यामुळे विविध राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि भाविकांना आपल्या घरी परतणे शक्य झाले आहे. राज्यात नाशिकहून भोपाळ आणि लखनौ येथे प्रत्येकी एक गाडी रवाना झाली, तेव्हा गाडीतील मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सर्वांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मात्र, कोणत्या गाडीने कोणी जायचे, हे स्थानिक जिल्हा प्रशासन ठरविणार आहे.नाशिकमध्ये दीड महिन्यापासून असलेल्या सुमारे ८४३ नागरिक महिला व मुलांना शनिवारी सकाळी विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखनौ येथे रवाना करण्यात आले, तर शुक्रवारी सायंकाळी ३३२ कामगारांना ६ डब्यांच्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले.तिकीट स्वत:च काढा...नावे नोंदविलेल्यांनाच ओळखपत्र देऊन आणि वैद्यकीय तपासणी करून गाडीत बसविले जाईल. या गाड्या प्रवासातील मधल्या स्थानकांवर थांबणार नाहीत. क्षमतेच्या ६० ते ७५ टक्के लोकच प्रवास करू शकतील. तिकिटाची रक्कम संबंधिताने द्यायची आहे. ही रक्कम राज्य सरकारांनी द्यावी, असे रेल्वेचे म्हणणे होते; पण बिहारने त्यास नकार दिला. त्यामुळे मजूर, भाविक व विद्यार्थ्यांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

केरळला ४०० गाड्या लागणारकेरळहून शनिवारी रात्री चार गाड्या उत्तर भारतात रवाना झाल्या. केरळमधील परप्रांतीय मजुरांसाठी ४०० गाड्या लागतील, असे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले. महाराष्ट्रातून आणखी कोठून आणि किती गाड्या जाणार, हे स्पष्ट झालेले नाही. केरळच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थी आहेत.अन्य राज्येही धास्तावलीमजूर, विद्यार्थी रेल्वेतून आपल्या राज्यात उतरल्यानंतर तेथेही त्यांची तपासणी होईल. कोणामध्ये कोरोनाची लक्षणे वा आजार आढळल्यास त्यांना रुग्णालयात नेले जाईल. नांदेडहून पंजाबला बसने गेलेले ३१४ जण पॉझिटिव्ह आढळल्याने अन्य राज्येही धास्तावली आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस