शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Lockdown News: गड्या आपला गाव बरा...अडकलेले मजूर लागले परतू: नाशिकहून दोन गाड्या रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:49 IST

मुंबईतून गाड्या सोडण्याबाबत अजून अनिश्चितता

नवी दिल्ली/नाशिक : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाउननंतर तब्बल ४२ दिवसांनी रेल्वेने प्रवासी वाहतूक सुरू केली असून, त्यामुळे विविध राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि भाविकांना आपल्या घरी परतणे शक्य झाले आहे. राज्यात नाशिकहून भोपाळ आणि लखनौ येथे प्रत्येकी एक गाडी रवाना झाली, तेव्हा गाडीतील मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सर्वांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मात्र, कोणत्या गाडीने कोणी जायचे, हे स्थानिक जिल्हा प्रशासन ठरविणार आहे.नाशिकमध्ये दीड महिन्यापासून असलेल्या सुमारे ८४३ नागरिक महिला व मुलांना शनिवारी सकाळी विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखनौ येथे रवाना करण्यात आले, तर शुक्रवारी सायंकाळी ३३२ कामगारांना ६ डब्यांच्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले.तिकीट स्वत:च काढा...नावे नोंदविलेल्यांनाच ओळखपत्र देऊन आणि वैद्यकीय तपासणी करून गाडीत बसविले जाईल. या गाड्या प्रवासातील मधल्या स्थानकांवर थांबणार नाहीत. क्षमतेच्या ६० ते ७५ टक्के लोकच प्रवास करू शकतील. तिकिटाची रक्कम संबंधिताने द्यायची आहे. ही रक्कम राज्य सरकारांनी द्यावी, असे रेल्वेचे म्हणणे होते; पण बिहारने त्यास नकार दिला. त्यामुळे मजूर, भाविक व विद्यार्थ्यांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

केरळला ४०० गाड्या लागणारकेरळहून शनिवारी रात्री चार गाड्या उत्तर भारतात रवाना झाल्या. केरळमधील परप्रांतीय मजुरांसाठी ४०० गाड्या लागतील, असे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले. महाराष्ट्रातून आणखी कोठून आणि किती गाड्या जाणार, हे स्पष्ट झालेले नाही. केरळच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थी आहेत.अन्य राज्येही धास्तावलीमजूर, विद्यार्थी रेल्वेतून आपल्या राज्यात उतरल्यानंतर तेथेही त्यांची तपासणी होईल. कोणामध्ये कोरोनाची लक्षणे वा आजार आढळल्यास त्यांना रुग्णालयात नेले जाईल. नांदेडहून पंजाबला बसने गेलेले ३१४ जण पॉझिटिव्ह आढळल्याने अन्य राज्येही धास्तावली आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस