शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Lockdown News: गड्या आपला गाव बरा...अडकलेले मजूर लागले परतू: नाशिकहून दोन गाड्या रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:49 IST

मुंबईतून गाड्या सोडण्याबाबत अजून अनिश्चितता

नवी दिल्ली/नाशिक : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाउननंतर तब्बल ४२ दिवसांनी रेल्वेने प्रवासी वाहतूक सुरू केली असून, त्यामुळे विविध राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि भाविकांना आपल्या घरी परतणे शक्य झाले आहे. राज्यात नाशिकहून भोपाळ आणि लखनौ येथे प्रत्येकी एक गाडी रवाना झाली, तेव्हा गाडीतील मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सर्वांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मात्र, कोणत्या गाडीने कोणी जायचे, हे स्थानिक जिल्हा प्रशासन ठरविणार आहे.नाशिकमध्ये दीड महिन्यापासून असलेल्या सुमारे ८४३ नागरिक महिला व मुलांना शनिवारी सकाळी विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखनौ येथे रवाना करण्यात आले, तर शुक्रवारी सायंकाळी ३३२ कामगारांना ६ डब्यांच्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले.तिकीट स्वत:च काढा...नावे नोंदविलेल्यांनाच ओळखपत्र देऊन आणि वैद्यकीय तपासणी करून गाडीत बसविले जाईल. या गाड्या प्रवासातील मधल्या स्थानकांवर थांबणार नाहीत. क्षमतेच्या ६० ते ७५ टक्के लोकच प्रवास करू शकतील. तिकिटाची रक्कम संबंधिताने द्यायची आहे. ही रक्कम राज्य सरकारांनी द्यावी, असे रेल्वेचे म्हणणे होते; पण बिहारने त्यास नकार दिला. त्यामुळे मजूर, भाविक व विद्यार्थ्यांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

केरळला ४०० गाड्या लागणारकेरळहून शनिवारी रात्री चार गाड्या उत्तर भारतात रवाना झाल्या. केरळमधील परप्रांतीय मजुरांसाठी ४०० गाड्या लागतील, असे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले. महाराष्ट्रातून आणखी कोठून आणि किती गाड्या जाणार, हे स्पष्ट झालेले नाही. केरळच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थी आहेत.अन्य राज्येही धास्तावलीमजूर, विद्यार्थी रेल्वेतून आपल्या राज्यात उतरल्यानंतर तेथेही त्यांची तपासणी होईल. कोणामध्ये कोरोनाची लक्षणे वा आजार आढळल्यास त्यांना रुग्णालयात नेले जाईल. नांदेडहून पंजाबला बसने गेलेले ३१४ जण पॉझिटिव्ह आढळल्याने अन्य राज्येही धास्तावली आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस