शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Lockdown News: लॉकडाऊनच्या काळात ७० टक्के लोकांना घरपोच वस्तू - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 02:35 IST

‘लोकमत’तर्फे आयोजित गृहनिर्माण सोसायट्यांच्या वेबिनारमध्ये दिला घरीच राहण्याचा संदेश

ठाणे : लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून ७० टक्के लोकांना अन्नधान्य, भाजीपाला घरपोच दिल्याची माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी दिली. दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना रस्त्यावर यावे लागले नाही, तर आपण कोरोनाच्या संकटावर लवकरात लवकर मात करू, असे पाटील म्हणाले.

‘लोकमत’ आणि महासेवातर्फे शनिवारी गृहनिर्माण संस्थांसाठी ‘कोरोना संकटात गृहनिर्माण सोसायट्यांनी घ्यायची खबरदारी,’ या विषयावर वेबिनार पार पडला. प्रीती किचन अप्लायन्सेसद्वारा समर्थित सारस्वत बँकेद्वारे तो सादर करण्यात आला. ‘लोकमत बेस्ट सोसायटी’ पुरस्काराच्या योजनेचा वेबिनार हा एक भाग होता. पाटील म्हणाले की, गृहनिर्माण संस्था व सहकारी संस्थांनी ३० एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीला २५ कोटींची मदत दिली आहे. लॉकडाउनमुळे काही भागांत शेतकऱ्यांचा माल वेळेत न पोहोचल्याने त्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा माल वेळेत ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे, यासाठी शासनाने भूमिका घेतली आहे. त्याकरिता सहकार आणि पणन विभाग प्रयत्न करीत आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून भाजीपाला, किराणा लोकांपर्यंत दिला जात आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्क बनविले जात आहेत. तसेच टिकाऊ आणि खाण्यायोग्य पदार्थ बनविण्याच्या सूचना बचत गटांना देण्यात आल्या आहेत. हाऊसिंग सोसायट्यांनी लॉकडाउनच्या काळात कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले आणि लोकमतच्या बेस्ट सोसायटी पुरस्कार स्पर्धेत जास्तीत जास्त सोसायट्यांनी भाग घेण्याचे आवाहन केले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार असताना शेतकºयांचा माल ग्राहकांना थेट मिळावा याकरिता आम्ही शेतकरी बाजार सुुरु करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटानंतर आता आपल्याला अ‍ॅपच्या माध्यमातून व्हर्च्युअल मार्केट निर्माण करावी लागतील. सरकारने या व्हर्च्युअल मार्केटला सक्रिय सहकार्य करावे. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांचा मोठा लाभ होईल. मार्केटिंगच्या कल्पकतेला वाव असून सेवा क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी या संकटानंतर निर्माण होतील, असे भाकित त्यांनी वर्तवले.

या सेमिनारमध्ये सहकार विभागाचे प्रशांत सोनावणे, संतोष पाटील, जे. डी. पाटील, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आक्रे, सारस्वत बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अभिजित प्रभू, खा. गोपाळ शेट्टी, वीणा सर्व्हिसेसचे करण नायर, अभिनेत्री किशोरी शहाणे, आदिती सारंगधर, जयवंत वाडकर, माय सोसायटी क्लबचे सीईओ राजीव सक्सेना, डॉ. संजय पांढरे, एमएनएस मीडियाचे सुनील शर्मा व महाराष्ट्रातील ५८० सोसायट्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ‘लोकमत’चे उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड अनिरु द्ध हजारे, महासेवाचे अध्यक्ष सीए रमेश प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.एकत्र पद्धतीने अन्नधान्यवाटपाचे मॉडेल राबवा !लॉकडाउन संपल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे, मास्क लावून घराबाहेर जावे लागेल, गर्दीत जाणे आणि अनावश्यक बाहेर फिरणे यावर बंधने घालावी लागतील, असेही फडणवीस यांनी लक्षात आणून दिले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनीही नागरिकांना सूचना आणि मार्गदर्शन केले. मुंबई ग्राहक मंचचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी कोरोना संकटकाळात ग्राहकांना संघटित करून एकत्र पद्धतीने अन्नधान्याचे वाटप करण्याचे मॉडेल सोसायट्यांनी राबवावे, असे आवाहन केले.

टॅग्स :Balasaheb Patilबाळासाहेब पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस