शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकिलांच्या मुदतवाढीत ‘लॉबिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:28 IST

निकष डावलून काहींना मुदतवाढ; दोषसिद्धीचा दर अवघा ५-६ टक्के असूनही नियुक्ती

- राजेश निस्तानेयवतमाळ : सत्र न्यायालयांमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून काम करणाऱ्या वकिलांना मुदतवाढ देताना शिक्षेच्या प्रमाणाचा (कनव्हीक्शन रेट) निकष अनेक ठिकाणी डावलला गेला आहे. चांगला रेट असतानाही कुणाला सेवा खंडित करून घरी बसविण्यात आले, तर कुणाला अवघा पाच-सहा टक्के दोषसिद्धीचा दर असताना केवळ ‘लॉबिंग’मुळे पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप होत आहे.सहसा राज्यात ज्या पक्षाचे-विचारधारेचे सरकार त्या पक्षाशी जवळीक ठेवणाºया वकिलांच्या नियुक्तीकडे कल राहत असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, विशेष सरकारी अभियोक्ता, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता यांना पुनर्नियुक्ती देताना त्यांनी हाताळलेल्या खटल्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे असा निकष गृहविभागाच्या १२ मे २०१५ च्या आदेशानुसार निश्चित करण्यात आला आहे. मात्र तो डावलून मुदतवाढ दिली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.२५ टक्क्यापेक्षा अधिक शिक्षेचे प्रमाण असताना एका महिला सरकारी अभियोक्त्याला पुनर्नियुक्ती दिली गेली नाही. कामाच्या बाबतीत त्यांची असलेली आक्रमकता बचाव पक्षाला अडचणीची ठरत असल्याने त्यांना थांबविले गेल्याचे बोलले जाते. तर त्याच वेळी अवघा सहा टक्के दर असलेल्या एका सरकारी अभियोक्त्याला मुदतवाढ दिली गेली. अशी काही उदाहरणे विदर्भात पुढे आली आहेत.मुख्यमंत्र्यांनी घेतला होता आढावामुख्यमंत्र्यांचा न्यायालयीन खटल्यांमध्ये दोषसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वाढविण्याकडे अधिक कल आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहे. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथे या संबंधीचा आढावा घेतला होता. तेव्हा फितूर होणाºया साक्षीदारांवर कारवाई होत नसल्याने हे प्रमाण वाढत असल्याचे व त्यातून दोषसिद्धीचे प्रमाण घटत असल्याचीबाब त्यांच्या निदर्शनास आली. तेव्हा अशा फितूर साक्षीदारांना चाप लावण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेत काय सुधारणा करता येईल, याचा अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी मुंबईतील उच्चपदस्थांना दिल्या होत्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार