शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, उद्धव ठाकरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 20:11 IST

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

नागपूर -  राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ही थेट त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ही थेट त्यांच्या बँकेत जमा होईल.  मागच्या सरकारनेही कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. पण त्यात वारंवार सुधारणा केल्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली नव्हती.'' दरम्यान राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून एक कठोर कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. ''राज्यात स्त्रियांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकरच कायदा करण्याचे विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मुख्यमंत्री कार्यालय सुरू केले जाणार आहे.  जेणेकरून त्या त्या जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या शासकीय कामासाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागू नयेत असे एक सीएमो कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे ही सगळी कार्यालय मंत्रालयाच्या कार्यालयाशी निगडीत असतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.  विदर्भाच्या विकासासाठी भरीव काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ''पूर्व विदर्भातील खनिज साठा हा आजपर्यंत दुर्लक्षित राहिला.  त्यासाठी पूर्व विदर्भात दिल भिलाई स्टील प्लँटच्या धर्तीवर पूर्व विदर्भात एक स्टील प्लँट उभारण्याचा मानस सरकारचा असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार