शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Load Shedding In Maharashtra: राज्यात भारनियमन जाहीर! अदानींमुळे अचानक वीज टंचाई; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 20:08 IST

अदानी पावर कंपनीने अचानकपणे तिरोडा प्लँटमधील पुरवठा बंद केला. अचानक त्यांनी हा निर्णय घेतला, नितीन राऊतांचा आरोप.

 राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे वीजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. यावर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांतून आठ हजार मेगावॅट वीज निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोल माईनमधील कर्मचाऱ्याचा स्टाईक झाला होता, डिझेलचे दरही वाढल्याने त्याचा परिणाम कोळशाच्या टंचाईवर झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे आम्हाला रेल्वे कोळसा आणण्यासाठी रेल्वे गाड्याच देत नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. आम्ही गेल्याच आठवड्यात राज्यात भारनियमन होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतू परिस्थिती बदलली आहे, असे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी राज्यात भारनियमन होणार असल्याची घोषणा केली आहे. 

अदानी पावर कंपनीने अचानकपणे तिरोडा प्लँटमधील पुरवठा बंद केला. ३१०० मेगावॅटचा करार आहे, सप्लाय १७६५ मेगावॅट केला. त्यांच्याकडून चौदाशे मेगावॅट वीज कमी मिळाली. अचानक त्यांनी हा निर्णय घेतला. जेएसड्ब्लूकडून १०० मेगावॅट वीज मिळायची, परंतू त्यांचा प्लँट बंद झाल्याने ती मिळत नाही. सीजीपीएलसोबत जो करार होता त्यानुसारही मागणी केली होती, ७६० मेगावॅट वीज मागितली आहे. त्यांनी ६३० मेगावॅट वीज दिली. आम्हाला वीज मिळत नाहीय, यामुळे आम्हाला भारनियमन करावे लागत आहे, असे ते म्हणाले. 

हे भारनियमन कधी संपेल हे सांगता येणार नाही. यामुळे नागरिकांनी वीजेच्या वापरावर काटकसर करावी. भारनियमनाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, तुम्हाला मेसेज, व्ह़ॉट्सअप द्वारे कळवू. आम्हाला जर १५०० मेगावॅट वीज कुठूनही मिळाली तर आम्ही भारनियमन रद्द करू. हवामान खात्याने चार पाच दिवस पाऊस पडेल असे म्हटले आहे. हा पाऊस जरी पडला तरी दिलासा मिळेल, असे नितीन राऊत म्हणाले. 

भारनियमन जे केले जाते त्याची सर्वात मोठे नुकसान बिले भरलेली नाहीत तिथे केले जाईल. वीज चोरी जिथे अधिक होते. तिथे भारनियमन करण्याचे आदेश दिले आहे. ही जिल्ह्यांमध्ये काही काही भाग असतात, त्यामुळे नेमके भाग सांगू शकत नाही, असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :electricityवीजAdaniअदानीNitin Rautनितीन राऊत