शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

Load Shedding In Maharashtra: राज्यात भारनियमन जाहीर! अदानींमुळे अचानक वीज टंचाई; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 20:08 IST

अदानी पावर कंपनीने अचानकपणे तिरोडा प्लँटमधील पुरवठा बंद केला. अचानक त्यांनी हा निर्णय घेतला, नितीन राऊतांचा आरोप.

 राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे वीजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. यावर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांतून आठ हजार मेगावॅट वीज निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोल माईनमधील कर्मचाऱ्याचा स्टाईक झाला होता, डिझेलचे दरही वाढल्याने त्याचा परिणाम कोळशाच्या टंचाईवर झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे आम्हाला रेल्वे कोळसा आणण्यासाठी रेल्वे गाड्याच देत नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. आम्ही गेल्याच आठवड्यात राज्यात भारनियमन होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतू परिस्थिती बदलली आहे, असे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी राज्यात भारनियमन होणार असल्याची घोषणा केली आहे. 

अदानी पावर कंपनीने अचानकपणे तिरोडा प्लँटमधील पुरवठा बंद केला. ३१०० मेगावॅटचा करार आहे, सप्लाय १७६५ मेगावॅट केला. त्यांच्याकडून चौदाशे मेगावॅट वीज कमी मिळाली. अचानक त्यांनी हा निर्णय घेतला. जेएसड्ब्लूकडून १०० मेगावॅट वीज मिळायची, परंतू त्यांचा प्लँट बंद झाल्याने ती मिळत नाही. सीजीपीएलसोबत जो करार होता त्यानुसारही मागणी केली होती, ७६० मेगावॅट वीज मागितली आहे. त्यांनी ६३० मेगावॅट वीज दिली. आम्हाला वीज मिळत नाहीय, यामुळे आम्हाला भारनियमन करावे लागत आहे, असे ते म्हणाले. 

हे भारनियमन कधी संपेल हे सांगता येणार नाही. यामुळे नागरिकांनी वीजेच्या वापरावर काटकसर करावी. भारनियमनाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, तुम्हाला मेसेज, व्ह़ॉट्सअप द्वारे कळवू. आम्हाला जर १५०० मेगावॅट वीज कुठूनही मिळाली तर आम्ही भारनियमन रद्द करू. हवामान खात्याने चार पाच दिवस पाऊस पडेल असे म्हटले आहे. हा पाऊस जरी पडला तरी दिलासा मिळेल, असे नितीन राऊत म्हणाले. 

भारनियमन जे केले जाते त्याची सर्वात मोठे नुकसान बिले भरलेली नाहीत तिथे केले जाईल. वीज चोरी जिथे अधिक होते. तिथे भारनियमन करण्याचे आदेश दिले आहे. ही जिल्ह्यांमध्ये काही काही भाग असतात, त्यामुळे नेमके भाग सांगू शकत नाही, असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :electricityवीजAdaniअदानीNitin Rautनितीन राऊत