शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

LMOTY 2025: कुणीही असा, कुठेही असा, जग बदलण्यासाठी मदत करा; ब्रह्मविहारी स्वामींचा जगण्याचा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 22:39 IST

आज मी इथं उभा आहे ते तुमच्या सर्वांमुळे, माझ्या गुरूंमुळे आहे. मी आजचा सन्मान तुमचं प्रेम म्हणून स्वीकारतो असंही स्वामी ब्रह्मविहारी यांनी म्हटलं. 

मुंबई - जीवनात तुम्ही जे काही करता त्याचं खरे बक्षीस किंवा पुरस्कार तुम्हाला काय मिळतं यात नाही तर तुम्ही काय बनता यात आहे. ज्यांनी त्यांच्या जीवनात काहीतरी चांगले काम केले आहे. त्यातून त्या व्यक्तीत झालेला बदल हा त्याचा खरा पुरस्कार आहे. जो कुणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही आणि चोरू शकत नाही असं विधान स्वामी ब्रह्मविहारी यांनी पुरस्कार सोहळ्यात केले. आंतरराष्ट्रीय नातेसंबंध जपणाऱ्या स्वामी नारायण संस्थेला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. 

राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वामी ब्रह्मविहारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आपल्या मनोगतात ते म्हणाले की, आपण या पृथ्वीवरील सर्वोकृष्ट व्यक्ती असलो तरी जर मी आपल्याला उडी मारायला सांगितलं, तर २ फूट, ३ फूट उडी माराल, ऑलिंपिक चॅम्पियन असाल तर ७  फूट, पोल वॉल्टर असाल तर १९ फूट उडी माराल पण आपण सर्वांनी उडी मारायचं ठरवलं तेव्हा चंद्रावर पोहचलो. अबू धाबीमधील मंदिर मानवतेच्या इतिहासातलं पहिलं मंदिर आहे. तिथे मंदिर होऊ शकत नाही असं मला हजारोंनी सांगितले. परंतु माझ्या अध्यात्मिक गुरूंनी माझ्या कानात सांगितले, एकेदिवशी अबू धाबीत मंदिर होईल. ती कानात सांगितलेली एक कुजबूज हजारो नकारांपेक्षा महत्त्वाची असते असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय मी नगण्य आहे, जगाच्या या प्रक्रियेत मी महत्वहीन आहे. परंतु तुम्ही कुणीही असाल, कुठेही असला तरी तुम्हाला जेवढं काही करता येईल ते करा, जेणेकरून जगाला बदलण्यासाठी ते मदत करेल. मी २०१३ मध्ये पहिल्यांदाच रॉयल माजलीसमध्ये प्रवेश केला. तिथे भगवे कपडे घातलेला साधू आजपर्यंत कुणी इस्लामिक राजाने पाहिला नव्हता. माझ्या आजूबाजूला ५० शेख होते, त्यातील एकाने मला विचारले, तुम्ही भगवे कपडे का घालता? यावर माझ्या मनातलं उत्तर मी त्याला दिले. आम्ही हिंदू आहोत. जेव्हा आमचा मृत्यू होतो तेव्हा आम्हाला पुरलं जात नाही तर दहन केले जाते. त्या अग्नितून आमचं शरीर नष्ट होते, त्याचा रंग केशरी, पिवळा अन् लाल असतो असं मी त्यांना सांगितले.

दरम्यान, जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा जगण्यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून असता. बाळाला काय खायचं हे ठरवण्याचा पर्याय नव्हता. काय थंड किंवा गरम हे सांगता येत नव्हते. कपड्यांबद्दल कधीच चिंता किंवा तक्रार नव्हती. तुम्ही जे दिले ते बाळाने स्वीकारले. जेव्हा आपण वृद्ध होऊ तेव्हाही आपण इतरांमुळे जगू. मधल्या काळात आपल्यामुळे इतर जिवंत आहेत असा विचार करतो, परंतु ते खरे नाही. आपण इतरांमुळे जगत असतो, आज मी इथं उभा आहे ते तुमच्या सर्वांमुळे, माझ्या गुरूंमुळे आहे. मी आजचा सन्मान तुमचं प्रेम म्हणून स्वीकारतो असंही स्वामी ब्रह्मविहारी यांनी म्हटलं. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025