शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

LMOTY 2019: मानवतेचा धर्म पाळा, आपला देश नक्की सुधारेल; आप्पासाहेब धर्माधिकारींचा 'गुरूमंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:39 IST

मी जात-पात, धर्म मानत नाही. माझ्यासाठी मन्युष ही जात आणि मानवता हा धर्म आहे - धर्माधिकारी

मुंबई : देशातील बऱ्याच व्यक्ती जात-पात, धर्म या गोष्टींमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळेच सध्या देशामध्ये माणूस म्हणून जगणे कठीण झाले आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर देश सुधारण्यास मदत होईल, असे मत जेष्ठ्य निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 'लोकमत'च्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये धर्माधिकारी म्हणाले की, " मी जात-पात, धर्म मानत नाही. माझ्यासाठी मन्युष ही जात आणि मानवता हा धर्म आहे. पण देशातील जात आणि धर्मांतील भेदभाव कमी व्हायला हवेत. जर प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर त्यामध्ये देशाचेच हित आहे. आपल्याला संतांची फार मोठी परंपरा आहे. जर आपल्याला आपण स्वत: कोण आहोत हे जाणायचे असेल तर संताची वचने वाचायला हवीत." 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्माधिकारी यांना यावेळी समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्कार स्वीकारल्यावर धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

धर्माधिकारी म्हणाले की, " मी कुठला महाराज वैगेरे नाही, मी फक्त चांगले विचार देतो. चांगल्या विचारांतून लोकांचे भले कसे करता येईल, हेच मी पाहत असतो. मी कधीच जाहिरात केली नाही, त्याची मला गरजही नाही. पण शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि लोकांकडूनही करवून घेणार." 

मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतोदेशाला घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे मन चांगले असायला हवे. मनामध्ये चांगले विचार असायला हवेत. मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार असणे महत्वाचे आहे. मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो. आपण प्रत्येकाने अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल," असे  धर्माधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे