शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
3
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
4
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
5
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
6
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
7
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
8
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
9
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
10
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
11
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
12
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
13
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
14
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
15
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
16
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
17
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
18
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
19
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
20
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने

संवादामुळे अमराठीशी सुखाने संसार; व्याकरणात न अडकण्याचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:52 IST

आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करण्याचा सूर

- चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) :  प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलता असेल तर भाषा संसाराच्या आड येत नाही, संसार सुरळीत होतो, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादातून निघाला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या विषयावरील परिसंवादात माजी परराष्ट्र सचिव आणि राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्या डॉ. साधना शंकर, आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मनोज कुमार आणि भारतीय भू-बंदर प्राधिकरणच्या सदस्या (वित्त) रेखा रायकर, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि राज्यसभेच्या खासदार सागरिका घोष, गायिका उद्योजक डॉ. मंजिरी वैद्य आणि प्रसन्न अय्यर या जोडप्यांनी सहभाग घेतला. विशेष पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. या परिसंवादाचे संयोजन अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी केले होते.

परिसंवादात मराठी-अमराठी संसारातील संवाद, कौटुंबिक नातेसंबंधांवरील परिणाम यावरही चर्चा झाली. भाषेमुळे संवाद होतो, व्याकरणात न पडता लोकांनी संवाद आपल्या आपल्या मातृभाषेत साधला पाहिजे, असे एक मत या परिसंवादात व्यक्त झाले.

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास निश्चित यश मिळते, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चर्चासत्रात उमटला.नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर आयोजित चर्चासत्रात बीव्हीजी समूहाचे हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर व वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी सहभागी झाले होते.उद्योजक रवी पंडित म्हणाले, आपण आपल्या क्षेत्रात काम करताना ते काम चांगले असेल, तर तेच काम आपली ओळख निर्माण करते. आपल्या वागण्या-बोलण्यातून आपले व्यक्तिमत्त्व ठरते. आपण आपल्या क्षेत्रात ध्येयाने प्रेरित असाल, तर लोकही मागे उभे राहतात. ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात मराठी पाऊल पुढे पडत आहे, ही आनंदाची बाब आहे. आपल्याला प्रगतीसाठी सर्वसामावेशक व्हावे लागणार आहे. वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी यांनी उद्योग व विविध क्षेत्रांतल्या प्रगतीत सहभाग, उद्योजकांचे योगदान व सद्य:स्थितीत सुरू असलेल्या बदलाबाबत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.

मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावीहणमंतराव गायकवाड म्हणाले, मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावी, एकमेकांना हातभार देणारी असावी. प्रत्येकाने आपल्याला काय काम करायचे आहे, ते ठरविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी आहे, ज्या क्षेत्रात आनंद मिळतो, तो मिळवावा. मराठी तरुणांनी आवडते क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे, असे सांगून गायकवाड म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी देशातील शेतकऱ्यांची प्रगती महत्त्वाची आहे. गावातच सर्व सुविधा मिळतील, अशा दृष्टीने नियोजनही महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ