शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

संवादामुळे अमराठीशी सुखाने संसार; व्याकरणात न अडकण्याचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:52 IST

आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करण्याचा सूर

- चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) :  प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलता असेल तर भाषा संसाराच्या आड येत नाही, संसार सुरळीत होतो, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादातून निघाला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या विषयावरील परिसंवादात माजी परराष्ट्र सचिव आणि राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्या डॉ. साधना शंकर, आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मनोज कुमार आणि भारतीय भू-बंदर प्राधिकरणच्या सदस्या (वित्त) रेखा रायकर, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि राज्यसभेच्या खासदार सागरिका घोष, गायिका उद्योजक डॉ. मंजिरी वैद्य आणि प्रसन्न अय्यर या जोडप्यांनी सहभाग घेतला. विशेष पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. या परिसंवादाचे संयोजन अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी केले होते.

परिसंवादात मराठी-अमराठी संसारातील संवाद, कौटुंबिक नातेसंबंधांवरील परिणाम यावरही चर्चा झाली. भाषेमुळे संवाद होतो, व्याकरणात न पडता लोकांनी संवाद आपल्या आपल्या मातृभाषेत साधला पाहिजे, असे एक मत या परिसंवादात व्यक्त झाले.

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास निश्चित यश मिळते, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चर्चासत्रात उमटला.नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर आयोजित चर्चासत्रात बीव्हीजी समूहाचे हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर व वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी सहभागी झाले होते.उद्योजक रवी पंडित म्हणाले, आपण आपल्या क्षेत्रात काम करताना ते काम चांगले असेल, तर तेच काम आपली ओळख निर्माण करते. आपल्या वागण्या-बोलण्यातून आपले व्यक्तिमत्त्व ठरते. आपण आपल्या क्षेत्रात ध्येयाने प्रेरित असाल, तर लोकही मागे उभे राहतात. ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात मराठी पाऊल पुढे पडत आहे, ही आनंदाची बाब आहे. आपल्याला प्रगतीसाठी सर्वसामावेशक व्हावे लागणार आहे. वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी यांनी उद्योग व विविध क्षेत्रांतल्या प्रगतीत सहभाग, उद्योजकांचे योगदान व सद्य:स्थितीत सुरू असलेल्या बदलाबाबत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.

मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावीहणमंतराव गायकवाड म्हणाले, मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावी, एकमेकांना हातभार देणारी असावी. प्रत्येकाने आपल्याला काय काम करायचे आहे, ते ठरविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी आहे, ज्या क्षेत्रात आनंद मिळतो, तो मिळवावा. मराठी तरुणांनी आवडते क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे, असे सांगून गायकवाड म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी देशातील शेतकऱ्यांची प्रगती महत्त्वाची आहे. गावातच सर्व सुविधा मिळतील, अशा दृष्टीने नियोजनही महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ