पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे
By Admin | Updated: May 31, 2014 22:38 IST2014-05-31T20:12:03+5:302014-05-31T22:38:26+5:30
जेीच्या उद्घाटनाच्या नामफलकावरून पालकमंत्री गणेश नाईक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत.

पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे
नवी मुंबई : जेीच्या उद्घाटनाच्या नामफलकावरून पालकमंत्री गणेश नाईक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत. म्हात्रे यांनी आज पोलिस आयुक्तांची भेट घेऊन नाईकांकडून जीवितास धोका असल्याचे निवेदन दिले आहे.
दिवाळे गावात कोळी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या जेीचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर नामफलक अधिकार्यांनी शुक्रवारी काढून टाकल्यामुळे पालकमंत्री गणेश नाईक व म्हात्रे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. ही घटना योग्य नाही. एकाच पक्षात असूनही आमदार असतानाही कधीही विश्वासात घेतले नाही. शहरातील शौचालयापासून सर्व वास्तूंच्या उद्घाटनाच्या पाट्यांवर पालकमंत्र्यांचे नाव झळकत आहे. परंतु आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही. परंतु एका पाटीसाठी त्यांनी घेतलेला अहास योग्य नसल्याचे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले होते.
राष्ट्रवादी काँगे्रसमधील उफाळून आलेला वाद आज पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला आहे. मंदा म्हात्रे यांनी पोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडून आपण व आपल्या परिवारास धोका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसमधील हा संघर्ष अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठी या वादाची दखल घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.