शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

'सहकारमंत्र्यांकडे चोरांना पकडण्याचा लायसन्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 01:48 IST

सहकारमंत्र्यांकडेच चोरांना पकडण्याचा लायसन्स दिले गेले आहे,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.

सातारा : ‘राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची ७७ कोटींची थकबाकी आहे. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. सहकारमंत्र्यांकडेच चोरांना पकडण्याचा लायसन्स दिले गेले आहे,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.सातारा येथे पत्रकारपरिषदेत तुपकर म्हणाले, ‘राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकºयांची साडेपाच कोटींची थकबाकी आहे. एफआरपीच्या कायद्यानुसार ऊस घेतल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाचे बिल शेतकºयांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असताना सर्वच कारखान्यांनी कायदा मोडला आहे. कोल्हापुरात झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफआरपीच्या रकमेसाठी कारखान्यांना राज्याची तिजोरी मोकळी करेन, असे म्हटले होते. संबंधित कारखान्यांवर फौजदारी करणे अपेक्षित होते, तरीही देखील सरकार तटस्थ भूमिका घेत आहे. कष्टकºयांच्या बाजूने धोरण आखायला सरकार तयार नाही, साखर निर्यातीचा निर्णय शासन घेत नाही. एका बाजूला पंतप्रधान उत्पादन वाढविण्याचे आवाहन शेतकºयांना करत आहेत याउलट जास्त साखर उत्पादित केली, म्हणून ती समुद्रात बुडवू, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात. हे शासन निष्क्रिय आहे. शेती मालाला हमीभाव मिळावा, यासाठी स्वाभिमानीने साथ दिली होती. आता शेतकºयांचा उद्रेक सरकारला सोसावा लागेल’चंद्रकांत पाटील गप्पा मारणारा माणूसदुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार असंवेदनशील आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हा गप्पा मारणारा माणूस आहे. मोठे आकडे फुगवून सांगून हेडलाईनपुरते ते बोलतात. किती दुष्काळग्रस्तांच्या दावणीला त्यांनी चारा दिला? ५० टक्के जनावरे कत्तलखान्याकडे गेली. माणसं मेल्यावर लाखाची मदत करण्यात काय अर्थ आहे, असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला.विमा कंपन्यांचे मंत्र्यांशी साटेलोटेदुष्काळ ओढवला तरी सरकार शेतकºयांना साथ देत नाही. चारा छावणी उभी करण्याबाबत निर्णय होत नाही. शेतकºयांचे नुकसान झाले, त्यांना विमा रक्कम देणे अपेक्षित असताना कायदा धाब्यावर बसवून विमा कंपन्यांचे लाड पुरविले जातात. विमा कंपन्यांचे सरकारमधील मंत्र्यांशी साटेलोटे आहेत, असा आरोप तुपकर यांनी केला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखाने